प्रेमविवाहाच्या ५ वर्षानंतर पतीने पत्नीचा गळा दाबून केली हत्या, जाणून घ्या वेदनादायक कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 09:03 PM2022-04-18T21:03:12+5:302022-04-18T21:03:50+5:30

Husband strangles wife to death :प्रताप नगर पोलिसांनी सांगितले की, दुपारी सेक्टर ८मध्ये महिलेचा खून झाल्याची माहिती मिळाली.

Husband strangles wife to death after 5 years of love marriage, find out the painful reason! | प्रेमविवाहाच्या ५ वर्षानंतर पतीने पत्नीचा गळा दाबून केली हत्या, जाणून घ्या वेदनादायक कारण!

प्रेमविवाहाच्या ५ वर्षानंतर पतीने पत्नीचा गळा दाबून केली हत्या, जाणून घ्या वेदनादायक कारण!

Next

जयपूर : राजधानी जयपूरमधील प्रतापनगर भागात एका महिलेचा गळा दाबून खून केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात महिलेचा पती मारेकरी असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे.

प्रताप नगर पोलिसांनी सांगितले की, दुपारी सेक्टर ८मध्ये महिलेचा खून झाल्याची माहिती मिळाली. महिलेच्या पतीने पोलीस ठाणे गाठून हत्येची माहिती दिली आणि सासरच्या मंडळींवर खुनाचा आरोप केला, मात्र प्राथमिक तपासात तक्रारदार पतीनेच पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, 27 वर्षीय रवीना तिच्या पतीसोबत सेक्टर ८मध्ये भाड्याच्या घरात राहत होती.

तिचा पती सलमान याने आधीच लग्न केले होते आणि ५ वर्षांपूर्वी रवीनासोबत प्रेमविवाह केला होता. दीड वर्षापूर्वी रवीनाला मुलगाही झाला, मात्र गेल्या काही महिन्यांपासून सलमान खालिदचा पत्नी रवीनासोबत वाद सुरू होता. या वादातून आज पती सलमानने पत्नीचा गळा आवळून खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. प्रताप नगर पोलीस आणि एफएसएल टीमने मृताच्या घरी पोहोचून पुरावे गोळा केले आहेत. पोलिसांनी मृताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जयपूरिया रुग्णालयाच्या शवागारात पाठवला आहे.

Web Title: Husband strangles wife to death after 5 years of love marriage, find out the painful reason!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.