खिचडीत मीठ जास्त झाल्याने गळा आवळून पतीने केली पत्नीची हत्या; भाईंदरमधील घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 06:04 PM2022-04-16T18:04:30+5:302022-04-16T18:05:47+5:30

गेले १५ दिवस घरगुती कारणावरून भांडण सुरु असतानाच शुक्रवारी साबुदाणा खिचडीत मीठ जास्त पडले म्हणून पतीने पत्नीची गळा आवळून निघृण हत्या केली.

husband strangles wife to death due to excess salt in khichdi incident in bhayander | खिचडीत मीठ जास्त झाल्याने गळा आवळून पतीने केली पत्नीची हत्या; भाईंदरमधील घटनेने खळबळ

खिचडीत मीठ जास्त झाल्याने गळा आवळून पतीने केली पत्नीची हत्या; भाईंदरमधील घटनेने खळबळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - गेले १५ दिवस घरगुती कारणावरून भांडण सुरु असतानाच शुक्रवारी साबुदाणा खिचडीत मीठ जास्त पडले म्हणून पतीने पत्नीची गळा आवळून निघृण हत्या केली . त्या नंतर स्वतःच पोलीस ठाण्यात जाऊन पत्नीची हत्या केल्याचे सांगितले . 

भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक तुषार माळोदे यांनीच ह्या हत्याकांडाची फिर्याद दिली आहे . फिर्यादी नुसार माळोदे हे सकाळी पोलीस ठाण्यात असताना पावणे दहाच्या सुमारास एक इसम आला  व त्याने स्वतःच्या पत्नी निर्मला (४०) हिचा गळा आवळला आहे असे सांगितलॆ .  पोलिसांनी त्याचे नाव विचारले असता निकेश राजाराम घाग (४६) रा . रोहीणी अपार्टमेंट, गोडदेव नाका असे त्याने सांगितले.  पोलिसांनी त्याला घेऊन रोहिणी इमारत गाठली असता तेथे लोकांची गर्दी झाली होती . तर निर्मला यांना रिक्षातुन नजीकच्या खाजगी रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरने त्या मरण पावल्या असल्याचे सांगितले . 

निर्मला यांचा भाऊ प्रभाकर गुरव यांच्या कडे पोलिसांनी माहिती घेतली असता , गेल्या १५ दिवसां पासून निकेश व निर्मला यांच्यात घरगुती कारणांनी भांडण सुरु होते . निकेश व निर्मला यांचा मुलगा चिन्मय (१२) ह्याने सकाळची घटना आजी शेवंती गुरव यांना कॉल करून रडत रडत सांगितली.  एका बँकेत काम करणाऱ्या निकेशचा शुक्रवारचा उपवास असल्याने निर्मला यांनी साबुदाण्याची खिचडी बनवली होती . परंतु खिचडीत मीठ जास्त झाल्याचे कारणावरून निकेशने पत्नी सोबत बेडरूम मध्ये भांडण सुरु केली . त्यांना मारहाण करत खाली पाडले व हाताने गळा आवळू लागला . पत्नीने प्रतिकार केला असता गॅलरीतील नायलॉनची दोरी आणून त्याने पत्नी निर्मलाचा गळा आवळला . चिमुरड्या चिन्मय ने आपल्या आईला वाचवण्यासाठी प्रयत्न केले व तो वडिलांना आईला सोडा म्हणून सांगत होता . परंतु खुनशी निकेश ने मुलाच्या रडण्याचा आकांत देखील विचारात घेतला नाही. निर्मला ह्या निपचित पडलेल्या पाहून निकेश घरातून निघून गेला. 

नातवाने कॉल करून घटना सांगितल्या नंतर मुलीच्या काळजीने आईचा जीव कासावीस झाला व त्यांनी तात्काळ मुलगा प्रभाकर ह्याला घटनास्थळी जाण्यास सांगितले . प्रभाकर हे पत्नी व मित्र दिनेश सह बहिणीच्या घरी पोहचले असता बहीण निर्मला निपचित पडलेल्या होत्या. नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून निकेश ह्याला अटक केली आहे . ह्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
 

Web Title: husband strangles wife to death due to excess salt in khichdi incident in bhayander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.