जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत झाली वाढ; वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 02:10 PM2024-01-12T14:10:10+5:302024-01-12T14:10:33+5:30

कायद्यानुसार तीन वर्षांचा तुरुंगवास होण्याची शक्यता?

Jitendra Awad's problem increased; A case has been registered at Vartaknagar police station | जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत झाली वाढ; वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत झाली वाढ; वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विशेष अधिवेशन पार पडले. त्यावेळी आमदार जितेंद्र आव्हाडांनी प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते, असे विधान केले. आमदार आव्हाडांनी हिंदू समाज बांधवांच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने वरील वादग्रस्त विधान केल्याची तक्रार भाजप प्रदेश उद्योग आघाडी महिलाध्यक्ष सेजल कदम यांनी केली होती. त्या तक्रारीवरून आव्हाड यांच्यावर वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आव्हाड यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता अधिक आहे. यापूर्वी आव्हाड यांच्यावर वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

वादग्रस्त विधानानंतर आव्हाडांविरोधात तीव्र नाराजी उमटण्यास सुरुवात झाली. यामध्ये राजकीय संघटनाच नाही तर धार्मिक संघटनांनी त्या वादग्रस्त विधानाबाबत आव्हाडांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पुढे आली. यासाठी पोलिस ठाण्यात संघटनांनी धावही घेतली होती. आव्हाड यांच्या बंगल्याबाहेर राष्ट्रवादी अजित पवार गटाने निषेधार्थ आंदोलन करण्याचा प्रयत्न केला; पण पोलिसांनी वेळीच धाव घेत त्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

तीन वर्षांचा तुरुंगवास?

कायद्यानुसार जर एखाद्या व्यक्तीने बोलून किंवा लिखित स्वरूपात किंवा चिन्हांद्वारे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या, तर भारतीय दंड विधानाच्या कलम २९५ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो, तसेच त्याला तीन वर्षांचा तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही, अशा शिक्षेची तरतूद कायद्यात आहे.

Web Title: Jitendra Awad's problem increased; A case has been registered at Vartaknagar police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.