हाताला मेहंदी लागण्याआधी घडला अनर्थ, मुलगी गव्हाच्या शेतात पोहोचली आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 09:41 PM2022-04-12T21:41:46+5:302022-04-12T21:42:08+5:30

Murder Case : लग्नाच्या अवघ्या ६ दिवसाआधी मुलीचा मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

The murder happened before the hand got mehndi, the girl reached the wheat field and ... | हाताला मेहंदी लागण्याआधी घडला अनर्थ, मुलगी गव्हाच्या शेतात पोहोचली आणि...

हाताला मेहंदी लागण्याआधी घडला अनर्थ, मुलगी गव्हाच्या शेतात पोहोचली आणि...

Next

बिहारमधील रोहतास जिल्ह्यात एका १९ वर्षीय तरुणीची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. घटना बिक्रमगंजमधील खनिता गावातील आहे. येथील शेतात मुलीचा मृतदेह पडलेला आढळून आला. 17 एप्रिलला मुलीचे लग्न होणार होते, असे सांगण्यात येत आहे. लग्नाच्या अवघ्या ६ दिवसाआधी मुलीचा मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी सासाराम सदर रुग्णालयात पाठवला. यासह पोलीस श्वानपथकाच्या मदतीने शेतातून पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत.

'शौचासाठी घराबाहेर पडली होती'

या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मुलीचा भाऊ बालाजीने सांगितले की, तिचे कोणाशीही वैर नाही. त्याची बहीण बाहेर शौचास गेली होती. बराच वेळ होऊनही ती घरी न परतल्याने तिचा शोध सुरू होता. त्यानंतर त्याचा मृतदेह गव्हाच्या शेतातून सापडला. सोनी कुमारी असे मृत महिलेचे नाव आहे. सोनी यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्याचवेळी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना कोणीही घडवली असेल त्याला सोडणार नाही असं पोलीस म्हणाले. 

Web Title: The murder happened before the hand got mehndi, the girl reached the wheat field and ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.