थरारक! ८ दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेने पतीला जिवंत जाळलं, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 07:57 PM2023-02-02T19:57:16+5:302023-02-02T19:57:54+5:30

जेवणानंतर सगळे लोक झोपले होते. बेशुद्धीचं औषध दिल्याने कुणीही जागं नव्हते.

The wife who came home after getting married 8 days ago burnt her husband alive at UP | थरारक! ८ दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेने पतीला जिवंत जाळलं, कारण...

थरारक! ८ दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेने पतीला जिवंत जाळलं, कारण...

googlenewsNext

एटा - आठ दिवसांपूर्वी लग्न करून आलेल्या नवविवाहितेने तिच्या पतीला जिवंत जाळण्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. या घटनेत पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. घरच्यांनी बळजबरीनं माझे लग्न लावलं त्यामुळे पतीलाच मारून टाकल्याचा हैराण करणारा खुलासा आरोपी पत्नीने केला आहे. मात्र युवकाच्या घरी शोककळा पसरली आहे. 

हसनपूर गावातील हा धक्कादायक प्रकार आहे. याठिकाणी बुधवारी रात्री दुष्यंत कुमार चौहानला जाळून मारल्या प्रकरणी पोलिसांनी नवविवाहिता संजना आणि तिचा प्रियकर या दोघांना अटक केली आहे. पोलीस चौकशीत आरोपी पत्नीनं सांगितले की, मी दुसऱ्यावर प्रेम करत होती. मात्र घरच्यांनी बळजबरीनं माझे लग्न लावून दिले. त्यामुळे पतीला मारून टाकण्याचा प्लॅन प्रियकर आणि पत्नीने मिळून केला. प्लॅननुसार पतीला जिवंत जाळण्यात आले. या घटनेनंतर दुष्यंतच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली आहे. 

दुष्यंतच्या पहिल्या पत्नीची मुलगी सौम्याने सांगितले की, आईनं हत्या करण्यापूर्वी आमच्या सर्वांच्या जेवणात नशेचं औषध दिले होते. युवक एका कंपनीत कारचालक म्हणून काम करायचा. तो कामावरून रात्री ९ वाजता घरी परतला. त्यानंतर त्यालाही बेशुद्धीचं औषध देण्यात आलं. हत्येचं प्लॅनिंग आधीच ठरलं होते. आरोपी पत्नीने रचलेल्या कटानुसार बेशुद्ध करून पतीला जिवंत जाळले. 

जेवणानंतर सगळे लोक झोपले होते. बेशुद्धीचं औषध दिल्याने कुणीही जागं नव्हते. परंतु छोट्या मुलीनं शुद्धीत आल्यानंतर पाहिले की एक व्यक्ती घरात आला होता तो जिन्यावरून टेरेसवर चढला होता. रविपाल सिंह यांचा दुष्यंत कुमार सिंह हा एकुलता एक मुलगा होता. २०१३ मध्ये त्याचे पहिले लग्न झाले होते. पहिल्या लग्नापासून त्याला ४ मुले आहेत. त्यात सौम्या(१०), छवि(७), शौर्य(५), वीर(२) वर्षाचा आहे. पहिली पत्नी मांडवीने मे २०२२ रोजी कौटुंबिक कलहामुळे विष पिऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर या घटनेतून कुटुंब सावरत होते. गावातील शिवकुमार सिंह यांनी त्यांच्या सासरकडील संजना नावाच्या मुलीचं दुष्यंत कुमार सिंह सोबत २३ जानेवारीला लग्न केले. ती पहिल्यांदा सासरी आली होती. कुणाचीही जास्त बोलत नव्हती. मात्र तिने केलेल्या या कृत्यामुळे कुटुंबामध्ये संताप व्यक्त होत आहे. 

Web Title: The wife who came home after getting married 8 days ago burnt her husband alive at UP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.