माता न तू वैरिणी...चार मुलांना नदीकाठी घेऊन गेली, तिघांना बुडून मारलं; चौथ्याने पळ काढला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 03:35 PM2024-06-27T15:35:36+5:302024-06-27T15:36:04+5:30

या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी आईला ताब्यात घेतले आहे.

Uttar Pradesh Crime News : mother killed four children, fourth escaped | माता न तू वैरिणी...चार मुलांना नदीकाठी घेऊन गेली, तिघांना बुडून मारलं; चौथ्याने पळ काढला

माता न तू वैरिणी...चार मुलांना नदीकाठी घेऊन गेली, तिघांना बुडून मारलं; चौथ्याने पळ काढला

Uttar Pradesh Crime News :उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या आईने आपल्या तीन निष्पाप मुलांना पाण्यात बुडवून मारले. सुदैवाने मोठ्या मुलाने कसाबसा स्वतःचा जीव वाचवला. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहे. घरच्यांशी झालेल्या भांडणाच्या रागातूने तिने हे कृत्य केल्याची माहिती आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रियंकाच्या पतीचे दीड वर्षांपूर्वी निधन झाले होते. ती आपल्या दीरासोबत औरैया जिल्ह्यातील फाफुंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केशमपूर गावात राहायची. दरम्यान, आज(दि.27) सकाळी तिचे दीरासोबत जोरदार भांडण झाले होते. यानंतर ती आपल्या चार मुलांसह नदीकाठी पोहोचली आणि तिघांना पाण्यात बुडवून मारले. मोठा मुलाने पळून जाऊन कसाबसा स्वतःचा जीव वाचवला. 

स्थानिकांना तीन मुलांचे मृतदेह पाण्यात तरंगाताना दिसले, यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच सीओ आणि पोलीस अधीक्षक त्यांच्या टीमसह घटनास्थळी पोहोचले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी आरोपी आईला ताब्यात घेतले असून तिची चौकशी सुरू आहे. 

 

Web Title: Uttar Pradesh Crime News : mother killed four children, fourth escaped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.