चार मुली असताना वंशाचा दिवा हवा, म्हणून चार वर्षांच्या मुलाचे अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 08:39 AM2023-08-09T08:39:13+5:302023-08-09T08:39:24+5:30

कल्याण रेल्वे स्थानकातील घटना, रेल्वेतून नाशिकला जात असताना आरोपीला अटक

When there are four girls, the lamp of the clan is wanted, so the kidnapping of a four-year-old boy | चार मुली असताना वंशाचा दिवा हवा, म्हणून चार वर्षांच्या मुलाचे अपहरण

चार मुली असताना वंशाचा दिवा हवा, म्हणून चार वर्षांच्या मुलाचे अपहरण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण रेल्वेस्थानकावरील वेटिंग रूममधून सकाळी चार वर्षांच्या मुलाचे एकाने अपहरण केले. याप्रकरणी कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने तपास सुरू करून अवघ्या आठ तासांत मुलाचा शोध लावला आणि त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी अपहरणकर्ता कचरू वाघमारे याला अटक केली. धक्कादायक म्हणजे कचरू वाघमारे याला चार मुली आहेत. वंशाचा दिवा आणि मुलाच्या हव्यासापोटी त्याने मुलाचे अपहरण केल्याची धक्कादायकबाब तपासात समोर आली.

कल्याण रेल्वेस्थानक परिसरातील करण गुप्ता आणि त्याची पत्नी शुभांगी गुप्ता हे दोघे मजुरीचे काम करतात. त्यांना चार वर्षांचा मुलगा आणि दोन वर्षांची मुलगी अशी दोन मुले आहेत. आज सकाळी कपडे धुण्यासाठी करण आणि शुभांगी कल्याण रेल्वेस्थानकावरील वेटिंग रूममध्ये आले. मात्र, साबण नसल्याने आपल्या दोन्ही मुलांना बाहेर  खेळायला सोडून ते जोडपे साबण आणण्यासाठी स्थानकाबाहेर गेले. यावेळी त्यांच्या मुलांसोबत आणखी चार मुली त्या ठिकाणी खेळत होत्या. त्याठिकाणी एक जोडपे होते. त्यांना आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्यास सांगून करण आपल्या पत्नीसह साबण आणण्यासाठी गेला. साबण घेऊन परतल्यानंतर त्यांना धक्काच बसला. अथर्व व त्यांच्यासोबत खेळत असलेल्या चारही मुली तिथे नव्हत्या.

करणने आजुबाजुला आपल्या मुलाचा शोध घेतला. मात्र, मुलगा आढळून आला नाही. त्याने कल्याण रेल्वे गुन्हे पोलिस ठाणे गाठले. कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने तत्काळ या मुलाचा शोध सुरू केला. स्थानक परिसरातील सीसीटीव्ही तपासले. मुलाच्या शोधासाठी पथके नेमली. सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास  एक जण अथर्वला घेऊन कल्याण रेल्वे स्थानक फलाटावरून जात असल्याचे आढळून आले. ही व्यक्ती नाशिकला जाणारी ट्रेन पकडण्याच्या घाईत होती. रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकाने या व्यक्तीवर झडप घालत त्याला ताब्यात घेतले. त्याच्या तावडीतून  मुलाची सुटका केली. 

चौकशीदरम्यान त्याचे नाव कचरू वाघमारे असल्याचे उघड झाले. कचरू वाघमारे याला चार मुली आहेत. त्याला मुलगा हवा होता. मुलाच्या हव्यासापोटी त्याने चार वर्षांच्या अथर्वचे अपहरण केल्याचीबाब समोर आली. पोलिसांनी कचरूला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे. 

Web Title: When there are four girls, the lamp of the clan is wanted, so the kidnapping of a four-year-old boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.