५५ टक्के शेतकरी कर्जाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:36 AM2021-09-05T04:36:39+5:302021-09-05T04:36:39+5:30

उस्मानाबाद : खरीप हंगाम संपत आला असतानाही कर्ज वाटपात बॅंकांची उदासीनता कायम आहे. अद्यापपर्यंत केवळ ९४ हजार ९६४ शेतकऱ्यांना ...

55% farmers waiting for loan | ५५ टक्के शेतकरी कर्जाच्या प्रतीक्षेत

५५ टक्के शेतकरी कर्जाच्या प्रतीक्षेत

googlenewsNext

उस्मानाबाद : खरीप हंगाम संपत आला असतानाही कर्ज वाटपात बॅंकांची उदासीनता कायम आहे. अद्यापपर्यंत केवळ ९४ हजार ९६४ शेतकऱ्यांना ६९१ कोटी ७९ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप झाले आहे. कर्ज वाटपाची टक्केवारी ४५ टक्के इतकी आहे, तर ५५ टक्के शेतकरी कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत.

वर्षा-दोन वर्षाआड पडणारा दुष्काळ, नापिकी, अतिवृष्टी अशा संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत असतो. यंदा पिकांचे नुकसान झाले, तर पुढील वर्षी चांगले उत्पादन मिळेल, या आशेवर शेतकरी पिके घेत असतात. शेती कामांसाठी शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता भासत असते. शेतकऱ्यांना शेतीकामासाठी रक्कम मिळावी, यासाठी शासनाकडून पीककर्ज उपलब्ध करून दिले जाते. उस्मानाबाद जिल्ह्यात यंदा खरीप हंगामासाठी १,५३९ कोटी ८० लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. एप्रिल महिन्यापासून प्रत्यक्ष कर्ज वितरणास प्रारंभ झाला. कोरोनामुळे एप्रिल व मे महिन्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. या काळात एसटी बस बंद असल्याने ग्रामीण भागातून शेतकऱ्यांना शहरातील बँकामध्ये येता येत नव्हते. त्यामुळे कर्ज वितरणाची गती मंदावलेली होती. जून महिन्यापासून निर्बंध शिथिल झाले, तसेच जून महिन्यात पाऊसही झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी उरकून घेतली. जून-जुलै, ऑगस्ट महिन्यातही कर्ज वाटपास म्हणावी तशी गती आलेली दिसत नाही. १५ ऑगस्ट अखेरपर्यंत ४ हजार ९६४ शेतकऱ्यांना ६९१ कोटी ७९ लाख रुपयांचे पीककर्ज वितरित करण्यात आले आहे. कर्ज वाटपाची टक्केवारी ४५ टक्के इतकी असून, अद्याप ६५ टक्के शेतकरी कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत.

महाराष्ट्र ग्रामीण बँक कर्ज वाटपात आघाडीवर

जिल्ह्यास खरीप हंगामासाठी १,५३९ कोटी ८० लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेस २६९ कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. या बँकेने १९ हजार ३९२ शेतकऱ्यांना १६७ कोटी ७ लाख रुपये कर्ज वितरित केले आहे. त्याची टक्केवारी ६२ इतकी आहे. त्या खालोखाल जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेने ४६ हजार २३३ शेतकऱ्यांना १८४ कोटी ७६ लाख रुपयांचे कर्ज वाटत केले. त्याची टक्केवारी ५६ इतकी आहे.

खरीप हंगाम संपत आला असून, मूग, उडीद पीक काढणीस आले आहेत. सोयाबीन पीक हे शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. मूग, उडीद पीक काढणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. या शेतकऱ्यांना मळणी, मजुरासाठी पैशाची आवश्यकता भासत आहे. मात्र, अशा स्थितीत पीककर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांना बँकेत हेलपाटे मारावे लागत आहेत.

Web Title: 55% farmers waiting for loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.