वीज तोडणी मोहीम थांबविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:31 AM2021-03-20T04:31:05+5:302021-03-20T04:31:05+5:30
या मोहिमेमुळे ज्यांनी वेळेवर वीजबिल भरणा केलेला आहे त्यांनाही याचा फटका बसत आहे. कनेक्शन तोडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना ...
या मोहिमेमुळे ज्यांनी वेळेवर वीजबिल भरणा केलेला आहे त्यांनाही याचा फटका बसत आहे. कनेक्शन तोडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. शिवाय, जनावरांचेही पाण्यावाचून हाल होत आहेत. एकीकडे पिकांची काढणीसाठी मजूर मिळत नसल्याने तसेच मजुरीचे दर वाढल्याने शेतकरी त्रस्त असताना दुसरीकडे महावितरणकडून ही मोहीम राबवून अडचणीत भर टाकली जात आहे. त्यामुळे ही मोहीम थांबवावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे.
यावर भाजपाचे जिल्हा सरचिटणीस आदम शेख, तालुकाध्यक्ष महादेव वडेकर, भटक्या विमुक्त जाती जमाती विभागाचे जिल्हाध्यक्ष सीताराम वनवे, युवक तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कुटे, तालुका सरचिटणीस संतोष सुपेकर, उपाध्यक्ष मधुकर अर्जुन, सचिन मस्के, शेतकरी उमेश नाईकिंदे, शंकर खामकर आदींच्या सह्या आहेत.