जमिनीच्या वादातून पतीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:32 AM2021-03-16T04:32:40+5:302021-03-16T04:32:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क आंबी (जि. उस्मानाबाद) : भूम तालुक्यातील जेजला येथे जमिनीच्या वादातून एकाची हत्या झाली आहे. याप्रकरणी सोमवारी ...

Husband's murder over land dispute | जमिनीच्या वादातून पतीची हत्या

जमिनीच्या वादातून पतीची हत्या

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

आंबी (जि. उस्मानाबाद) : भूम तालुक्यातील जेजला येथे जमिनीच्या वादातून एकाची हत्या झाली आहे. याप्रकरणी सोमवारी सायंकाळी देण्यात आलेल्या तक्रारीनुसार पाचजणांवर आंबी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

जेजला येथील बळीराम जगन्नाथ भोसले यांचे १३ मार्च रोजी पत्नीबरोबर शेतीच्या कारणावरून भांडण झाले होते. त्यानंतर ईश्वर ज्ञानोबा देशमुख, परमेश्वर ज्ञानोबा देशमुख, संभाजी भागवत देशमुख (तिघे रा. कंडारी), शहाजी दगडू मोटे (रा. गिरवली) व गंगूबाई बळीराम भोसले यांनी संगनमत करून बळीराम भोसले यांचे हात-पाय दोरीने बांधून दुचाकीवर बसवून राहत्या घरी आणले. याठिकाणी त्यांना काठीने मारहाण केली व कोंडून ठेवले. दरम्यान, हा प्रकार फिर्यादी कालिदास चंद्रकांत भोसले यांना समजला. बळीराम भोसले यांना जबर जखमी करुन घरात कोंडून ठेवल्याची त्यांनी खात्री केल्यानंतर आत जाऊन पाहिले असता, बळीराम हे जागेवरच गतप्राण झाले होते. यानंतर कालिदास भोसले यांनी आंबी पोलीस ठाणे गाठून मयत बळीराम यांच्या पत्नीसह अन्य चारजणांनी मारहाण करुन बळीराम यांचा खून केल्याची तक्रार दिली. त्यानुसार पाचजणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर करत आहेत.

Web Title: Husband's murder over land dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.