१६ केंद्रांवर हरभरा खरेदी शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:32 AM2021-03-16T04:32:23+5:302021-03-16T04:32:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उस्मानाबाद : केंद्र शासनाच्या आधारभूत किमतीनुसार २०२०-२१ या वर्षासाठी जिल्ह्यातील दि महाराष्ट्र को-ऑप मार्केटिंग फेडरेशनच्यावतीने २१ ...

Zero purchase at 16 centers | १६ केंद्रांवर हरभरा खरेदी शून्य

१६ केंद्रांवर हरभरा खरेदी शून्य

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

उस्मानाबाद : केंद्र शासनाच्या आधारभूत किमतीनुसार २०२०-२१ या वर्षासाठी जिल्ह्यातील दि महाराष्ट्र को-ऑप मार्केटिंग फेडरेशनच्यावतीने २१ हरभरा नोंदणी व खरेदी केंद्र निश्चित केली आहेत. मात्र, या केंद्रांपैकी १६ केंद्रांवर अद्यापही खरेदीला सुरुवात झालेली नाही तर ५ केंद्रांवर १ हजार ८०० क्विंटल हरभऱ्याची खरेदी झाली आहे.

जिल्ह्यात यावर्षी ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात परतीचा दमदार पाऊस झाला होता. या पावसामुळे खरिपातील पिके शेतकऱ्यांच्या हातची गेली होती. मात्र, दुसरीकडे प्रकल्पात पाणीसाठा वाढल्याने रब्बी हंगामातील पाण्याचा प्रश्न मिटला. मुबलक पाणी व पोषक वातावरण असल्याने अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पेरणी उरकून घेतल्या. ज्वारी, गव्हासोबतच हरभऱ्याचाही पेरा केला. निसर्गाच्या कृपेने हरभरा पीक चांगले आले. कष्टाने पिकवलेल्या मालाला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असते. केंद्र शासनाने आधारभूत किमतीनुसार हरभऱ्याला ५ हजार १०० रुपये दर निश्चित केला. शेतकऱ्यांना हरभरा विक्रीसाठी २१ केंद्र कार्यान्वितही केली आहेत. या केंद्रांवर १५ फेब्रुवारीपासून नोंदणीला सुरुवात झाली असून, आतापर्यंत ६ हजार ५६४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी ३ हजार ३३२ शेतकऱ्यांना संदेश प्राप्त झाले आहेत. २१ केंद्रांपैकी १६ केंद्रांवर अद्याप खरेदी झालेली नाही तर ५ केंद्रांवर १ हजार ८०० क्विंटल हरभऱ्याची खरेदी झाली आहे.

चौकट...

केंद्र शासनाने हरभऱ्याला ५ हजार १०० रुपये हमीभाव निश्चित केला आहे. आडतीवर ४ हजार ७०० ते ४ हजार ८०० रुपये भाव मिळत आहे. मात्र, अनेक शेतकरी केंद्रावर पैसे मिळण्यास विलंब होत असल्याने शिवाय चाळणी व हमालीसाठी अधिक पैसे मोजावे लागत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आडतीवर क्विंटलला तीनशे ते चारशे रुपयाने कमी भाव मिळत असला, तरी लवकर पैसे मिळत असल्याचे सांगण्यात आले.

तक्रारी असतील तर संपर्क साधावा

जिल्ह्यातील खरेदी केंद्रांवर चाळणीसाठी अधिकचे शुल्क, हमालीचे जादा पैसे मागितल्यास जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाशी शेतकऱ्यांनी संपर्क साधून तक्रार देण्याचे आवाहन या कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

कोट...

जिल्ह्यात २१ हरभरा खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. १५ फेब्रुवारीपासून ऑनलाईन नोंदणीला प्रारंभ झाला आहे. शासनाने हरभऱ्याला ५ हजार १०० रुपये दर निश्चित केला आहे. शेतकऱ्यांनी त्वरित नावनोंदणी करुन घ्यावी, संदेश प्राप्त झाल्यानंतर नजीकच्या केंद्रावर हरभरा विक्रीसाठी घेऊन यावा.

- व्ही. एच. वाचपेयी, जिल्हा मार्केटिंग अधिकारी

Web Title: Zero purchase at 16 centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.