Vidhan Sabha 2019 : भाजपची लेखाजोखा मांडण्याची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 09:51 PM2019-09-24T21:51:52+5:302019-09-24T23:07:19+5:30

उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यकर्ता संमेलन : भुपेंद्र यादव यांचे प्रतिपादन

The tradition of setting up a BJP audit | Vidhan Sabha 2019 : भाजपची लेखाजोखा मांडण्याची परंपरा

dhule

Next
ठळक मुद्देअनेकांचा पक्ष प्रवेशनड्डा ऐवजी आले यादवगुणवत्तेनुसार उमेदवारी मिळणाऱ़़ मंंत्री गिरीश महाजनांचे स्पष्टीकरण४२ आमदार आम्ही विजयी करुन दाखवू असे आश्वासन

धुळे : भाजपची स्वतंत्रपणे काम करण्याची पध्दत आहे़ सत्तेच्या काळात काय काम केले, कोणते निर्णय घेतले याचा लेखाजोखा मांडण्याची परंपरा असून ती आजही कायम आहे़ यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा काढली़ त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे़ त्यामुळे आगामी काळात फडणवीस सरकार विराजमान होईल असा विश्वास महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला़ दरम्यान, त्यांच्या उपस्थितीत काही कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश नोंदविला़
होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचा उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यकर्ता संकल्प संमेलन धुळ्यात पार पडले़ त्यावेळी यादव मार्गदर्शन करताना बोलत होते़ व्यासपिठावर राज्याचे संघटनमंत्री विजय पुराणिक, खासदार डॉ़ सुभाष भामरे,  जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार एकनाथ खडसे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर कल्याणी अंपळकर, स्थायी समिती सभापती युवराज पाटील, माजी मंत्री डॉ़ विजयकुमार गावित, खासदार डॉ़ हिना गावित, खासदार रक्षा खडसे, उन्मेष पाटील, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार स्मिता वाघ, अ‍ॅड़ किशोर काळकर, अनुप अग्रवाल, बबन चौधरी, उदेसिंग पाडवी, विजय चौधरी, आमदार संजय सावकारे, आमदार चंद्रकांत पटेल, सिमा भोळे, उज्वला पाटील, आमदार देवयानी फरांदे, आमदार बाळासाहेब सानप, खासदार भारती पवार, अशोक कांडेलकर, ओमप्रकाश खंडेलवाल, शितल नवले, सोनल शिंदे, जयश्री अहिरराव, शशी मोगलाईकर, विजय पाच्छापूरकर, हिरामण गवळी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते़
भूपेंद्र यादव पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने कलम ३७० रद्द करुन खूप मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे़ भ्रष्टाचाराच्या विरोधात पक्ष काम करीत आहेत़ देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा काढून पाच वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. काम करणाऱ्यांना पक्षात संधी दिली जाते़
विजय पुराणिक यांनी भाजप पक्ष आणि आजवर केलेली कामांची माहिती घरोघरी द्या़
मंत्री रावल म्हणाले, पुर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून धुळ्याकडे बघितले जात होते़ आता धुळेच नाहीतर संपूर्ण खान्देश भाजपचा बालेकिल्ला झाला आहे़ कार्यकर्त्यांनी गाफिल राहू नये असेही सांगितले. शेवटी आभार अनुप अग्रवाल यांनी मानले़
जनसंवाद - दुपारी राम पॅलेस येथे झालेल्या संवाद कार्यक्रमात ३७० कलम रद्द केल्याने, जम्मु-काश्मिरही विकासाच्या मुख्य प्रवाहात येईल. असा विश्वास भाजपचे महाराष्टÑाचे प्रभारी अ‍ॅड. भूपेंद्र यादव यांनी व्यक्त केला.यावेळी शहरातील व्यापारी, डॉक्टर, वकील, शैक्षणिक संस्थाचालक आदी उपस्थित होते.
अनेकांचा पक्ष प्रवेश
उत्तर महाराष्ट्र विभागीय मेळाव्याचे औचित्यसाधून अनेकांनी भाजप पक्षात आपला पक्षप्रवेश नोंदविला़ त्यात धुळ्यातून माजी आमदार अनिल गोटे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे अमोल सूर्यवंशी आणि माजी नगरसेविका वंदना सूर्यवंशी, प्रदीप पानपाटील यांनी प्रवेश घेतला.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
व्यासपिठावर राज्याचे संघटनमंत्री विजय पुराणिक, जलसंपदा मंत्री एकनाथ खडसे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, प्रदेश उपाध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री खासदार डॉ़ सुभाष भामरे, प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, खासदार डॉ़ हिना गावित, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, खासदार भारती पवार, माजी मंत्री आमदार डॉ़ विजयकुमार गावित, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार स्मिता वाघ, आमदार संजय सावकारे, आमदार चंद्रकांत पटेल, आमदार देवयानी फरांदे, आमदार बाळासाहेब सानप, जळगाव जिल्हा परिषद अध्यक्षा उज्वला पाटील, महापौर सीमा भोळे (जळगाव), महापौर चंद्रकांत सोनार, माजी आमदार उदेसिंग पाडवी, भाजपा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी (धुळे ग्रामीण), विजय चौधरी (नंदुरबार), डॉ.संजू पाटील (जळगाव) अनूप अग्रवाल (धुळे महानगर जिल्हाध्यक्ष), अ‍ॅड.किशोर काळकर (विभागीय संघटन सचिव), धुळ्याच्या उपमहापौर कल्याणी अंपळकर, धुळे महापालिका स्थायी समिती सभापती युवराज पाटील, नगरसेवक शितल नवले, नगरसेवक सोनल शिंदे, माजी महापौर जयश्री अहिरराव, विजय पाच्छापूरकर, हिरामण गवळी उपस्थित होते़
गुणवत्तेनुसार उमेदवारी मिळणाऱ़़ मंंत्री गिरीश महाजनांचे स्पष्टीकरण
मेळाव्यात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना विविध बाबींचा परामर्श घेतला़ पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक येथे येऊन गेले, त्यावेळेस उत्तर महाराष्ट्रातून ४७ आमदारांपैकी किमान ४२ आमदार आम्ही विजयी करुन दाखवू असे आश्वासन दिले आहे़ हे आश्वासन बुथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांच्या जोरावर दिले आहे़ त्यामुळे कार्यकर्त्यांनी मनापासून कामाला लागले पाहीजे़ ते म्हणाले आपल्या पक्षात अनेकांनी प्रवेश केला आहे़ त्यामुळे त्यांना संधी दिली जाईल, निष्ठावंतांचे काय होईल, असे अनेक प्रश्न सध्या कार्यकर्त्यांच्या मनात आहेत़ परंतु उमेदवारी देताना किंवा कोणतेही पद देताना त्यांची गुणवत्ता आणि काम तपासूनच संधी दिली जाईल़ तसेच हे करत असताना निष्ठावान कार्यकर्त्यांना प्रथम संधी असेल हे विसरु नका़ आपापसातील काही गट बाजी असेल ती दूर ठेवा असा सल्लाही महाजन यांनी मनोगतातून कार्यकर्त्यांना दिला़
नड्डा ऐवजी आले यादव
भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे़ पी़ नड्डा हे उत्तर महाराष्ट्र विभागीय मेळाव्यासाठी येणार होते़ त्यादृष्टीने नियोजन देखील करण्यात आले होते़ परंतु दिल्ली येथे तातडीची बैठक असल्यामुळे नड्डा पुण्याहून परस्पर दिल्लीकडे रवाना झाले़ मेळाव्याचे नियोजन ठरलेले असल्यामुळे भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांना ऐनवेळी निमंत्रित करण्यात आले़ ते मुंबईतच असल्यामुळे त्यांनी लागलीच होकारही दिला़

Web Title: The tradition of setting up a BJP audit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे