जागतिक व्यापार जातोय रसातळाला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 00:42 IST2020-04-16T00:42:32+5:302020-04-16T00:42:43+5:30

आयातीवर जसा परिणाम झाला आहे, तसाच निर्यातीवरही झाला आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या अभ्यासानुसार, आधीच बहुसंख्य आशियाई देशांची निर्यात आयातीपेक्षा खूपच कमी आहे;

Global trade goes to the abyss! | जागतिक व्यापार जातोय रसातळाला!

जागतिक व्यापार जातोय रसातळाला!

ठळक मुद्देसर्वाधिक फटका आशियाला; भूकबळींची संख्या वाढणार


‘कोरोना’ कथा
‘कोरोना’मुळे अख्ख्या जगाचा व्यापारउदीम जवळपास ठप्प झाला आहे. जागतिक व्यापार संघटनेनंही याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली
आहे. जगातला कोणताही देश यातून सुटणार नाही
असं सांगताना ही संघटना वस्तुस्थितीवर नेमकं
बोट ठेवते आहे. आजच्या घडीलाच कोरोनामुळे जागतिक व्यापाराला
सुमारे तीस टक्के फटका बसला आहे.

जग/आशिया
कोरोना व्हायरसनं अख्ख्या जगालाच अस्थिरतेच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं आहे. ही अस्थिरता कधी संपेल, जीवन सर्वसामान्य कधी होईल, काहीच सांगता येत नाही. अजूनही अनेक देश आपापल्या अपुऱ्या आरोग्यसेवेनिशी कोरोनाशी लढण्याचा प्रयत्न करताहेत. मृतांची संख्या रोज वाढतेच आहे. अख्ख्या जगाचा व्यापारउदीम जवळपास ठप्प झाला आहे.
जागतिक व्यापार संघटनेनंही याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. जगातला कोणताही देश यातून सुटणार नाही असं सांगताना जागतिक व्यापार संघटना वस्तुस्थितीवर नेमकं बोट ठेवते आहे. आजच्या घडीलाच कोरोनामुळे जागतिक व्यापाराला सुमारे तीस टक्के फटका बसला आहे. अनेक देशांसाठी हा आघात वेगवेगळा असला तरी कोणत्याही देशासाठी दोन आकड्यांपेक्षा कमी नाही.

आयातीवर जसा परिणाम झाला आहे, तसाच निर्यातीवरही झाला आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या अभ्यासानुसार, आधीच बहुसंख्य आशियाई देशांची निर्यात आयातीपेक्षा खूपच कमी आहे; पण जी काही निर्यात आहे, तीही ठप्प झाली आहे. याचा आशियाई देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा विपरित परिणाम झाला आहे. उत्तर अमेरिकेच्या निर्यातीलाही प्रचंड मोठा फटका बसला आहे. आशियाई देशांना या संकटातून सावरायचं तर त्यासाठी त्यांना लवकरात लवकर आणि अनेक आघाड्यांवर तातडीनं प्रयत्न करावे लागतील. तज्ज्ञांचं म्हणणं आहे, नाहीतर आशियाई देशात भूकबळी वाढायला फार वेळ लागणार नाही. जागतिक व्यापाराच्या अनिश्चिततेची ही परिस्थिती किमान वर्षभर तरी चालेल, असा अंदाज आहे. तरीही खात्रीनं अजून काहीच सांगता येत नाही. कारण कोरोना आपली विखारी पंजे अधिकाधिक आवळतोच आहे आणि त्यावर रामबाण इलाज अजून सापडलेला नाही.
केवळ दोन महिन्यांतच जागतिक व्यापारातील उलाढाल १२ ते ३२ टक्क्यांनी कमी झालेली आहे. आंतरराष्टÑीय नाणेनिधीनंही यासंदर्भात धोक्याची घंटा वाजविलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की, कोरोनानं जगाच्याच डोळ्यांत पाणी आणलं आहे. केवळ तीन महिन्यांपूर्वी जागतिक विकास यावर्षी किमान ३.३ टक्क्यांनी वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता; पण विकास दूरच, आताच्या घडीला जागतिक विकासात तब्बल तीन टक्क्यांनी घट झाली आहे.
एका अभ्यासानुसार, इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेचंही कंबरडं कोरोनानं मोडलं आहे. केवळ दुसºया तिमाहीतच त्यांच्या अर्थव्यवस्थेला किमान ३५ टक्के भगदाड पडेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. एकीकडे अर्थव्यवस्था मोडकळीस आलेली, तर दुसरीकडे लोकांचे रोजगारही झपाट्यानं जाताहेत. उद्योगधंदे बंद पडल्यामुळे लाखो लोक बेघर होताहेत. सरकारच्या अधिकृत माहितीनुसार, दोन महिन्यांत इंग्लंडमधल्या वीस लाख लोकांना रोजगार गमवावा लागला आहे.
जागतिक अर्थव्यवस्था रुळावर आणायची तर आधी सर्व उद्योगधंदे पूर्ण क्षमतेनं सुरू व्हायला हवेत. ते सुरू झाले तरी लोकांची त्याला मागणी असली पाहिजे. कारण कोरोनानं आता लोकांचे प्राधान्यक्रमच पूर्णत: बदलून टाकले आहे. या परिस्थितीतून सावरायचं तर संपूर्ण जगालाच आपापले मतभेद बाजूला ठेवून जागतिक कल्याणाच्या द्ृष्टीनं पावलं उचलावे लागतील, असा सल्लाही तज्ञांनी दिला आहे.

 

 

Web Title: Global trade goes to the abyss!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.