बारावीच्या पहिल्याच पेपरमध्ये घोळ! प्रश्नामध्येच उत्तर दडलं, सहा गुणांवरती निर्णय घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 05:14 PM2023-02-21T17:14:12+5:302023-02-21T17:14:21+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून सुरू झाली. यंदा मुंबई विभागातून ३ लाख ४४ हजार ७४४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली.

Errors were found in the 12th English paper Board will decide on 6 points | बारावीच्या पहिल्याच पेपरमध्ये घोळ! प्रश्नामध्येच उत्तर दडलं, सहा गुणांवरती निर्णय घेणार

बारावीच्या पहिल्याच पेपरमध्ये घोळ! प्रश्नामध्येच उत्तर दडलं, सहा गुणांवरती निर्णय घेणार

googlenewsNext

मुंबई- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून सुरू झाली. यंदा मुंबई विभागातून ३ लाख ४४ हजार ७४४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. मुंबईतील ६३५ केंद्रांवर परीक्षा सुरू झाली. आज पहिल्याच पेपरमध्ये घोळ झाल्याचे समोर आले आहे. आज बारावीचा पहिला इंग्रजी या विषयाचा पेपर होता. यात तीन प्रश्नांमध्ये घोळ असल्याचे समोर आले आहे. यामुळे आता या सहा मार्कांसाठी बोर्ड काय निर्णय घेणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. 

आजपासून बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली. आज इंग्रजी या विषयाचा पहिलाच पेपर होता. पहिल्याच पेपरमध्ये प्रश्नांमध्ये घोळ झाल्याचे समोर आले, इंग्रजी पेपरच्या पान नंबर १० वर प्रश्न क्र. ३ वर आणि त्यातील उपप्रश्न A3, A4 आणि A5 मध्ये प्रश्नच दिलेला नाही यात A5 आणि A5 मध्ये प्रश्नच दिलेला नाही, तर A4 मध्ये थेट उत्तरच दिलेले आहे. यामुळे बारावीचे विद्यार्थी संभ्रमात आहेत. याबाबत आता बोर्डाने स्पष्टीकरण दिले आहे. यावरच लवकरच निर्णय घेऊ असं बोर्डाने सांगितले आहे. तीनही प्रश्न ६ गुणांचे आहेत. त्यामुळे आता या प्रश्नावर बोर्ड काय निर्णय घेणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.   

All The Best! आजपासून बारावीची परीक्षा; मुंबईत ३ लाखांहून अधिक विद्यार्थी

समुपदेशन आणि हेल्पलाइनची सोय

मुंबई विभागीय मंडळाच्या अंतर्गत असलेल्या परीक्षा केंद्रांवर बारावी परीक्षेची आवश्यक तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती विभागीय सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी दिली. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे मानसिक दडपण येऊ नये म्हणून मंडळाकडून प्रत्येक विभागीय मंडळामध्ये समुपदेशन आणि हेल्पलाइनची सोय उपलब्ध करून दिल्याचेही बोरसे यांनी सांगितले. मुंबईतील परीक्षकांची संख्या ६७ आहे. शैक्षणिक हित लक्षात घेता एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, म्हणून सोमवारपर्यंत अर्ज स्वीकारल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची सगळी काळजी शाळा व्यवस्थापनाकडून घेतली जाईल. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्याव्यात. परीक्षा काळातही समुपदेशन उपलब्ध राहणार असल्याने काही अडचणी, समस्या आल्यास विद्यार्थ्यांनी त्यावर संपर्क साधावा. याशिवाय मंडळाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या अतिरिक्त दहा मिनिटांच्या सुविधेचा विद्यार्थ्यांनी उपयोग करून घ्यावा.

- सुभाष बोरसे, सचिव, मुंबई विभागीय मंडळ 

Web Title: Errors were found in the 12th English paper Board will decide on 6 points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.