शेतकरी नवरा नकाे गं बाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:33 AM2021-03-22T04:33:26+5:302021-03-22T04:33:26+5:30

तालुका, जिल्हा स्थळासाेबतच माेठ्या शहरांमध्ये मुली देण्यासाठी वधूपिता उत्सुुक असतात. गावखेड्यामध्ये सुविधा राहत नसल्याने अशा स्थळांकडे दुर्लक्ष केले जाते. ...

Farmer husband nakae gam bai! | शेतकरी नवरा नकाे गं बाई !

शेतकरी नवरा नकाे गं बाई !

Next

तालुका, जिल्हा स्थळासाेबतच माेठ्या शहरांमध्ये मुली देण्यासाठी वधूपिता उत्सुुक असतात. गावखेड्यामध्ये सुविधा राहत नसल्याने अशा स्थळांकडे दुर्लक्ष केले जाते. व्यापारी अथवा मुलगा कुठलाही व्यवसाय करत असेल तर सामान्य घरातील मुलगी त्याला देण्यासाठी तयारी दर्शविली जाते. मात्र, करत असलेल्या व्यवसायात ताे स्थायिक झाला काय? याचाही विचार केला जाताे. त्यामुळे लग्नकार्यात वरपक्षाकडील मंडळींना विविध बाबींचा सामना करावा लागत आहे. सद्य:स्थितीत समाजाच्या पसंती-नापसंतीची पद्धत बदलत असल्याचे दिसून येत आहे.

काेट ......

शेती व्यवसाय हा चांगला असला तरी त्यात धाेके अनेक आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसायात बऱ्याचदा नुकसान हाेत असते. माझ्याकडे सात एकरापेक्षा अधिक शेती आहे. मात्र, मुलाचे लग्न जुळविण्यासाठी याेग्य मुलगी मिळत नसल्याचे समस्या आहे. - पांडुरंग लटारे, वरपिता

काेट ....

पूर्वी शेतीला महत्त्वाचे स्थान हाेते. मुलगा काय करताे, याला महत्त्व नव्हते तर शेती किती आहे, कुटुंबीय कसे आहेत, त्याची प्रतिष्ठा कशी आहे. या बाबीला महत्त्व दिले जात हाेते. मात्र, आता काळानुसार स्वरूप बदलले आहे. सद्य:स्थितीत नाेकरीला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. शेतकऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकाेन बदलला आहे. मुलगा शेती करताे, असे सांगितले की, अनेक मुलींचा दृष्टीकाेन नकारात्मक दिसताे. - नीळकंठ तिवाडे, वरपिता

काेट .......

लग्नकार्यात मुलीच्या विराेधात जाता येत नाही, पूर्वी आई-वडील, कुटुंबातील लाेकांनी पसंत केलेला मुलगा, स्थळ नाकारले जात नव्हते. मात्र, आता काळानुरूप बदल झाला आहे. आता मुलीच्या मनाला प्राधान्य आहे. शेवटी तिचे आयुष्य सुखी व चांगले जावाे, अशीच आई-वडिलांची इच्छा असते. - लक्ष्मण गाेटा, वधूपिता

काेट .......

मुलगी पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. मुलगा नाेकरी असलेला मिळेल तर आम्ही नक्कीच लग्नासाठी तयार हाेऊ. नाेकरी किंवा व्यवसाय करणारा मुलगा असावा, अशी मुलीची इच्छा आहे. - भक्तदास चुधरी

काेट ......

दिवसेंदिवस वधू-वर परीक्षण कठीण हाेत चालले आहे. वधू-वर सूचक मंडळाकडे अनेक अर्ज येत आहेत. प्रत्येकाला सुखी व धनाढ्य कुटुंबाची अपेक्षा आहे. मुलाकडून सुंदर व देखण्या स्थळाची मागणी असते. दाेन्हीकडील परिस्थिती जुळली तरी विवाह जुळून येताे. - पंढरीनाथ कांबळे, संचालक, तेली समाज वर-वधू सूचक केंद्र, गाेगाव.

काेट ...

२० एकर शेती असलेल्या मुलाला मुलीकडील मंडळी मुलगी देण्यासाठी तयार हाेत नाही. १० हजार रुपये मासिक वेतन मिळविणाऱ्या व शहरात राहणाऱ्या मुलांना वधूकडील मंडळी प्राधान्य देत आहेत. आपण वर-वधू नाेंदणीसाठी तयार केलेल्या व्हाॅट्स ॲप ग्रुपवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. बऱ्याच जणांचे लग्नकार्य या ग्रुपच्या माध्यमातून जुळले आहेत.

- प्रदीप महाजन, विवाह सल्लागार, पुलखल

बाॅक्स ..

सर्वाधिक मागणी डाॅक्टरांना

सर्वाधिक मागणी डाॅक्टर व अभियंत्यांना आहे. असे स्थळ असेल, तरच आमची मुलगी दाखवू असे वधूपित्यांकडून सांगितले जात आहे. यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना मुली शाेधताना अडचणी येत आहेत.

सद्य:स्थितीत वधूपित्याचे भाव वधारले आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील, गरीब घरातील मुलगी असली तरी वधूपिता जे वाक्य बाेलेल ते वरपित्याला मान्य करावे लागेल. अन्यथा लग्न जुळणे कठीण आहे.

शेतकरी कुटुंबामध्ये मुलगी देण्यासाठी वधूपिता तयार नाही. शेतकऱ्यांकडे व त्यांच्या कुटुंबाकडे पैसा राहत नाही. शेती निसर्गावर अवलंबून आहे. यामुळे वधूपिता शेतकरी कुटुंबाला मुलगी द्यायला तयार नाही.

बाॅक्स .....

अटी मान्य असतील तर बाेला

सद्य:स्थितीत लग्न ही एक जाेखमेची बाब म्हणून शेतकरी कुटुंबाला वाटत आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतकरी कुटुंबांमध्ये मुली देण्याचे प्रमाण कमी झाले आहे. शहरात असणारा मुलगा हवा. ताे एकटाच असावा. त्याला बहीण-भाऊ नसावे, अशा अटी बरेच कुटुंबीय टाकत असतात. मुलांकडूनही सुंदर दिसणारी मुलगी प्राधान्य क्रमाने निवडली जात आहे. अपेक्षा पूर्ण हाेत असेल तरच लग्न जुळून येत आहेत.

Web Title: Farmer husband nakae gam bai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.