वायनाड घटनेने सर्वांचे डोळे उघडले! मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2024 08:16 AM2024-08-11T08:16:15+5:302024-08-11T08:16:53+5:30

ग्लोबल वॉर्मिंगमुळे निसर्गाचा समतोल बिघडतोय

wayanad incident opened everyone eyes said cm pramod sawant  | वायनाड घटनेने सर्वांचे डोळे उघडले! मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

वायनाड घटनेने सर्वांचे डोळे उघडले! मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

लोकमत न्यूज नेटवर्क डिचोली: आईप्रमाणेच झाडांची काळजी घ्या. वायनाड प्रकरण आमचे डोळे उघडणारे असून ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम जाणवत आहेत. निसर्ग संवर्धन ही काळाची गरज आहे. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारी घेणे गरजेचे आहे. अन्यथा त्याचे विपरीत परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

'एक पेड माँ के नाम' अंतर्गत मुख्यमंत्र्यांनी साखळी येथील सरकारी शाळेच्या आवारात वृक्षारोपण केले. यावेळी भारतीय जनता पार्टी को-ऑपरेटिव्ह सेलचे अनिल काणेकर, नगरसेवक, शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रत्येक विद्यार्थी, पालकांनी वृक्ष संवर्धन, निसर्गरक्षण, पर्यावरण जागृती यांबाबत विशेष योगदान द्यावे. आज जागतिक पातळीवर निसर्गावर घाला होत असताना निसर्ग जगला तरच सृष्टी सुस्थितीत राहील याचे भान ठेवून सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. यावेळी मुलांनी झाडे लावली आणि शपथही घेतली.

 

Web Title: wayanad incident opened everyone eyes said cm pramod sawant 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.