कृषी केंद्रामधून बोगस बियाणांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:19 AM2021-06-30T04:19:05+5:302021-06-30T04:19:05+5:30

केशोरी : यावर्षी मृग नक्षत्र लागल्यापासूृन पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे घाईघाईने शेतकऱ्यांनी मिळेल त्या किंमतीमध्ये कृषी केंद्रामधून धान बियाणे ...

Sale of bogus seeds from agricultural centers | कृषी केंद्रामधून बोगस बियाणांची विक्री

कृषी केंद्रामधून बोगस बियाणांची विक्री

Next

केशोरी : यावर्षी मृग नक्षत्र लागल्यापासूृन पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे घाईघाईने शेतकऱ्यांनी मिळेल त्या किंमतीमध्ये कृषी केंद्रामधून धान बियाणे खरेदी करून खरीप हंगामातील धान पेरणी आटोपली. परंतु धान बियाणे ७० टक्केच उगवल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. कृषी केंद्रामधून बोगस बियाणे विक्री केली जात असल्याची शंका बळावली आहे. कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर धाडी टाकून कारवाई करण्याची मागणी केशोरी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

जिल्ह्यात मानसून दाखल होताबरोबर केशोरी परिसरात मृग नक्षत्र लागल्या दिवसापासून पावसाला सुरुवात झाली. काही शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील धान पिकाची कापणी केल्याबरोबर पऱ्हे टाकले होते. त्यांची धानाची पऱ्हे उगवली नाही. परंतु काही शेतकऱ्यांनी पावसामुळे पऱ्हे टाकणे जगत नसल्यामुळे घाई-घाईने कृषी केंद्रामधून धानाची बियाणे घेऊन पऱ्हे भरून पेरणी आटोपली. यादरम्यान कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत होती. पेरणीची घाई न करता बियाणांची उगवण क्षमता पडताळून बियाणे खरेदी करणे शेतकऱ्यांनी अपेक्षित होते. बियाणे कंपन्याच्या जाहिरातीवर आकर्षित न होता बियाणांची खात्री करूनच बियाणे खरेदी करणे आवश्यक असताना पेरणीचे हंगाम आटोपण्याच्या घाई-घाईने बऱ्याच शेतकऱ्यांनी कृषी केंद्रामधून खरेदी केलेली बियाणे १०० टक्के उगवली नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची ओरड होत आहे.

...........

आंध्र व मध्य प्रदेशातून आले बियाणे

या परिसरातील अनेक कृषी केंद्रांनी आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशामधून कमी किमतीच्या बोगस बियाणे आणून शेतकऱ्यांना जास्त किमतीमध्ये बियाणे विकण्याचा गोरखधंदा सुरू केल्याचे बाेलल्या जाते. त्या बियाणांची उगवण क्षमता योग्य नसल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी बियाणे विकत घेतली त्या शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अशा कृषी केंद्रामधून शेतकऱ्यांना पक्के बिल दिले जात नाही. शासनाने ठरवून दिलेल्या दराने बियाणांची विक्री केली जात नाही. अशी शेतकऱ्यांची ओरड आहे. कृषी विभागाने अशी बोगस बियाणे विकणाऱ्या कृषी केंद्रावर धाडी टाकून कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Sale of bogus seeds from agricultural centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.