आमगावात जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:25 AM2018-04-11T00:25:11+5:302018-04-11T00:25:11+5:30

शहराला मागील आठवडाभरापासून कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे. परिणामी शहरात पाणी टंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली असून पहाटेपासून पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू असल्याचे चित्र आहे.

Water congestion in Amgaon | आमगावात जलसंकट

आमगावात जलसंकट

Next
ठळक मुद्देशहरवासीयांची पाण्यासाठी भटकंती : उपाय योजनेकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : शहराला मागील आठवडाभरापासून कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे. परिणामी शहरात पाणी टंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली असून पहाटेपासून पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू असल्याचे चित्र आहे. मात्र यावर उपाय योजना करण्याकडे प्रशासनाने पाठ फिरविल्याने आमगाव येथे जलसंकट निर्माण झाले आहे.
आमगाव शहरातील नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे. यासाठी वाढीव पाणी पुरवठा योजना स्थापन करण्यात आली. २.५० लक्ष पाणी टाकीचे व जलवाहिनीचे नविनीकरण करण्यात आले. यात माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर यांनी या योजनेला गती दिली. या योजनेत वाढीव पाणी पुरवठा व पाणी टाकीची क्षमतेप्रमाणे वाढ करणे अपेक्षित होते.मात्र त्यासाठी प्रशासनाने कमी प्रमाणात निधी दिल्याने पाणी टाकीच्या क्षमतेत वाढ करणे शक्य झाले नाही.
शहराच्या वाढत्या लोकसंख्येला या योजनेव्दारा पाणी पुरवठा शक्य होत नसल्याचे चित्र आहे. परिणामी शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. मागील वर्षी जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने नदी नाले कोरडे पडले आहे. त्याचाच परिणाम पाणी पुरवठा योजनेवर झाला आहे. या पाणी टाकीची क्षमता अडीच लाख लिटर क्षमतेची असली तरी प्रत्यक्षात त्यात केवळ १ लाख ५० हजार लिटर पाणी साठविले जात आहे. तर मागील बऱ्याच कालावधीपासून पाणी टाकीची साफसफाई न केल्याने मोठ्या प्रमाणात गाळ साचले आहे. पाणी पुरवठ्यासाठी केवळ दोन मोटारपंप लावले असून ते देखील अपूरे पडत आहे.
यासर्व गोष्टींमुळे आमगाववासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. आमगावला पाणी पुरवठा होणाऱ्या बाघ नदीचे पात्र देखील कोरडे पडल्याने मागील आठवडाभरापासून पाणी टंचाईची बिकट समस्या निर्माण झाली आहे. शहरवासीय पाणी टंचाईच्या संकटाला तोंड देत असताना स्थानिक प्रशासन मात्र केवळ बघ्याची भूमिका बजावित असल्याने नागरिकांमध्ये रोष व्याप्त आहे.
भविष्यकालीन उपाय योजनांचा अभाव
शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात पाणी पुरवठ्यासह इतर उपाययोजनात वाढ करणे आवश्यक आहे. दरवर्षी आमगाव शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. त्यावरुन नागरिकांची ओरड होते. मात्र यावर उपाय योजना करण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष झाले आहे. दरवर्षी तहान लागल्यावर विहीर खोदण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. त्यामुळे नागरिक पाण्यासाठी पायपीट करतात. लोकप्रतिनिधीनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे समाजसेविका ज्योती खोटेले यांनी सांगितले.

Web Title: Water congestion in Amgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.