मूळव्याधामुळे उठणं-बसणं अवघड झालंय? आयुर्वेद डॉक्टरांनी सांगितला एक खास उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 12:59 PM2024-06-05T12:59:35+5:302024-06-05T13:01:29+5:30

Piles : ही समस्या कधी कधी इतकी वाढते की, सर्जरी करण्याची वेळ येते. अशात आज आम्ही तुम्हाला मूळव्याध दूर करण्याचा एक आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत. 

Ayurved doctor told best Ayurvedic treatment to get rid of piles | मूळव्याधामुळे उठणं-बसणं अवघड झालंय? आयुर्वेद डॉक्टरांनी सांगितला एक खास उपाय

मूळव्याधामुळे उठणं-बसणं अवघड झालंय? आयुर्वेद डॉक्टरांनी सांगितला एक खास उपाय

Piles : पाइल्स म्हणजे मूळव्याधची समस्या आजकाल जास्तीत जास्त लोकांना होत आहे. मूळव्याधची समस्या इतकी गंभीर असते की, व्यक्तीचं उठणं, बसणं आणि झोपणंही अवघड होतं. मूळव्याध झाल्यावर गुदद्वारात इतक्या वेदना होतात की सहन होत नाहीत. पण ही समस्या होण्याला आपणंच कारणीभूत असतो. आपल्याच काही चुकांमुळे ही समस्या होते. ही समस्या कधी कधी इतकी वाढते की, सर्जरी करण्याची वेळ येते. अशात आज आम्ही तुम्हाला मूळव्याध दूर करण्याचा एक आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत. 

आयुर्वेद डॉक्टर विलास शिंदे यांनी इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर करून मूळव्याध दूर करण्याचा, कोंब गाळून पाडण्याचा एक सोपा आणि आयुर्वेदिक उपाय सांगितला आहे. हा उपाय तुम्ही घरीच सहजपणे करू शकता.

डॉ. विलास शिंदे यांनी सांगितलं की, "कडूलिंबाचं फळ म्हणजे लिंबोळ्या मूळव्याध दूर करण्यासाठी फार फायदेशीर असतात. लिंबोळ्याचा एक खास मलम तयार करून लावला तर मूळव्याधामुळे आलेला कोंबही गळून पडतो आणि मूळव्याध बरा होतो. यासाठी मूठभर लिंबोळ्या घ्याच्या आणि त्यातील गर काढायचा. हा गर खोबऱ्याच्या तेलात टाकून गॅसवर चांगला परतवून घ्या. तो लालसर झाला असेल त्यानंतर मलम गाळून घ्या. काही दिवस सकाळी संध्याकाळ हा मलम लावा. याने मूळव्याधाचा कोंब गळून पडेल आणि तुम्हाला आराम मिळेल".

काय आहे मुळव्याध?

मुळव्याध हा एक असा आजार आहे ज्यात मलाशय मार्गात आतून आणि बाहेरून सूज येते. यामुळे बाहेरच्या आणि आतील बाजूस काही मांस जमा होतं. यातून रक्तही येतं आणि वेदनाही भरपूर होते. 

पाइल्स होण्याची कारणं

पाइल्स वाढण्याचं कारण बदलती लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्यात झालेले बदल हे आहेत. आजकाल फळं खाण्याऐवजी त्यांचा ज्यूस घेतला जातो. यात फायबर नसतं. पण आपल्या मोठ्या आतडीमध्ये केवळ फायबर आणि पाणी जातं. फास्ट फूडच्या चलनामुळे आणि फिजिकल अॅक्टिविटी कमी झाल्याने लोक पाणीही कमी पितात. यामुळे लोक पाइल्सचे शिकार होतात.

- बद्धकोष्ठता

- जास्त तिखट, तेलकट तसंच बाहेरचे पदार्थ जास्त खाणे

- जास्त मांसाहार, मद्यसेवन, सिगारेट, तंबाखू सेवन

- एका जागी बसून तासंतास काम करणे

- सतत जास्त जागरण करणे

- जेवणाच्या आणि कामाच्या अनियमित वेळा

- कोरडे आणि शिळे अन्न खाणे

- अनुवांशिक

Web Title: Ayurved doctor told best Ayurvedic treatment to get rid of piles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.