पावसाळ्यात भुट्टा खाल्ल्यावर जास्तीत जास्त लोक करतात 'ही' चूक, आरोग्याचं होऊ शकतं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 10:36 AM2024-08-13T10:36:47+5:302024-08-13T11:01:02+5:30

Water after eating bhutta : मका खाल्ल्याने हृदयासंबंधी आजार दूर राहतात. पण भुट्टा खाल्ल्यानंतर जास्तीत जास्त लोक एक चूक करतात. जी केल्यावर आरोग्याचं मोठं नुकसान होतं.

Side effects of drinking water after eating bhutta or corn in monsoon | पावसाळ्यात भुट्टा खाल्ल्यावर जास्तीत जास्त लोक करतात 'ही' चूक, आरोग्याचं होऊ शकतं नुकसान

पावसाळ्यात भुट्टा खाल्ल्यावर जास्तीत जास्त लोक करतात 'ही' चूक, आरोग्याचं होऊ शकतं नुकसान

Water after eating bhutta : रिमझिम पाऊस आणि त्यात मक्याचं भाजलेलं कणीस खाणं सगळ्यांनाच आवडतं. पावसात गरम गरम कणीसावर लिंबाचा रस, थोडं मीठ आणि तिखट लावून खाणं ही एक मेजवानीच असते. याची टेस्ट तर चांगली लागतेच सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. कारण यात अनेक पोषक तत्व असतात. जे आरोग्य चांगलं ठेवण्यास फायदेशीर असतात.

इतकंच नाही तर भुट्टा खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल म्हणजेच अतिरिक्त फॅटही कमी होतं. यात बायोफ्लेवोनॉयड्स, कॅरोटेनॉयड्स, व्हिटॅमिन्स आणि फायबर असतात जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. त्यामुळेच मका खाल्ल्याने हृदयासंबंधी आजार दूर राहतात. पण भुट्टा खाल्ल्यानंतर जास्तीत जास्त लोक एक चूक करतात. जी केल्यावर आरोग्याचं मोठं नुकसान होतं.

भुट्टा खाल्यावर पाणी पिण्याचे तोटे

भुट्टा खाल्यानंतर जास्तीत जास्त लोक पाणी पितात. पण असं करणं तुम्हाला महागात पडू शकतं. याने वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. नेहमीच प्रयत्न असावा की लगेच पाणी पिऊ नये. जर तुम्ही असे केले तर तुम्हाला पोट फुगण्याची समस्या होऊ म्हणजेच ब्लोटिंग होऊ शकतं. यासोबतच पचनतंत्र कमजोर होण्याचाही धोका असतो. अनेकदा ही समस्या गॅस्ट्रोपॅरीसिसस या रोगाचं रुप घेते. यामुळे पोटात दुखणे आणि गॅस होणे ही समस्या होते.

कधी कधी इतका त्रास होतो की, व्यक्ती जेवणही करु शकत नाही. मक्याच्या दाण्यांमध्ये कार्बोस आणि स्टार्च भरपूर प्रमाणात असतात. जेव्हा या दोन्ही तत्वांमध्ये पाणी मिसळतं तेव्हा पोटात गॅस जमा होते. ज्यामुळे पोटात दुखणे, अॅसिडिटी आणि आणखीही काही गंभीर समस्या होतात. त्यामुळे भुट्ट्यावर पाणी पिऊ नये.

किती वेळाने प्यावे पाणी?

भुट्टा खाल्यानंतर पाणी न पिण्याची गोष्ट ऐकून मग पाणी प्यायचं कधी? असा प्रश्न पडला असेल. प्रश्न योग्यही आहे. भुट्टा खाल्यानंतर साधारण ४५ मिनिटांनी पाणी प्यावे. किंवा भुट्टा खाण्याआधीही पाणी पिऊ शकता. असे केल्याने तुम्हाला होणारी समस्या होणार नाही.

भुट्टा खाण्याचे फायदे

१) मका आपल्याला होणाऱ्या सामान्य समस्या जसे की, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. मक्यामध्ये अधिक प्रमाणात फायबर असतात जे आतड्यांमधील विषारी पदार्थ बाहेर काढतं. 

२) मका प्रत्येक वयाच्या लोकांसाठी फायदेशीर आहे. यात मॅग्नेशिअम आणि आयर्न असतात जे हाडं मजबूत करण्यासाठी उपयोगी असतात. त्यासोबतच कॉर्नमध्ये झिंक आणि फॉस्फोरस असतात जे फायदेशीर आहे. 

३) मक्यामध्ये कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतात त्याने शरीराला एनर्जी मिळते. याने तुमचा आळसही दूर होतो. जर तुम्हाला दिवसभर थकवा जाणवत असेल आणि काम करण्याचा आळस येत असेल तर आहारात कॉर्नचा म्हणजेच मक्याचा समावेश करा. 

४) मका तुमच्या डोळ्यांसाठीही खूप फायदेशीर आहे. कारण यात व्हिटॅमिन ए आणि बीटा-कॅरोटीन असतं. हे खाल्ल्याने डोळ्यांसंबंधी समस्या जसे मॅक्युलर डी जनरेशन होत नाही. 

Web Title: Side effects of drinking water after eating bhutta or corn in monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.