वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं नारळ पाणी; जाणून घ्या नेमकं कधी प्यावं?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 11:46 AM2024-08-03T11:46:26+5:302024-08-03T11:59:49+5:30

नारळ पाणी हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर मानलं जातं.

tender coconut water as weight loss drink | वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं नारळ पाणी; जाणून घ्या नेमकं कधी प्यावं?

वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं नारळ पाणी; जाणून घ्या नेमकं कधी प्यावं?

वाढत्या वजनामुळे आपल्यापैकी अनेकांना त्रास होतो आणि ते आरोग्यासाठीही चांगलं नाही, कारण त्यामुळे हाय कोलेस्टेरॉल, मधुमेह, हाय ब्लड प्रेशर आणि हार्ट अटॅक येण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. जेव्हा पोट आणि कंबरेभोवती चरबी जमा होऊ लागते, तेव्हा शरीराचा आकार बिघडतो, त्यावेळी आत्मविश्वासाचा कमी होतो. तसेच इतर आरोग्यविषयक समस्या देखील निर्माण होतात. 

नारळ पाणी हे एक नैसर्गिक पेय आहे जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. खेड्यापासून शहरापर्यंत सर्वत्र ते उपलब्ध असतं. जेव्हा आपण समुद्राच्या किनाऱ्यावर सुट्टी एन्जॉय करायला जातो तेव्हा आपल्याला ते प्यायला जास्त आवडतं. नारळ पाण्याचे नियमित सेवन केल्यास वजन कमी करता येतं.

नारळाच्या पाण्यात आढळणारे पोषक घटक

प्रसिद्ध डाएटीशियन आयुषी यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर आपण नारळ पाणी पिण्याची सवय लावली तर शरीराला व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि नैसर्गिक पोषक घटक मिळतील ज्यामुळे शरीर हायड्रेटेड राहील आणि फ्रेश वाटेल.

वजन कसं होतं कमी?

नारळ पाण्यात नैसर्गिक साखर असते आणि त्यामध्ये कॅलरीज देखील कमी प्रमाणात आढळतात, तसेच कार्बोहाइड्रेट्सचे प्रमाण देखील कमी असते, ज्यामुळे मेटाबॉलिज्म वाढतं आणि पचनक्रिया सुधारते. नारळ पाणी एकदा प्यायल्यावर तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटतं. अशा परिस्थितीत तुमचं वजन हळूहळू कमी होतं. फळांचा रस पिण्यापेक्षा नारळ पाणी पिण्याचे जास्त फायदे आहेत कारण त्यात जास्त मिनरल्स असतात.

कधी प्यावं नारळ पाणी?

नारळाचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर असून ते सकाळी रिकाम्या पोटी प्यावं, तर त्याचा परिणाम दिवसभर दिसून येईल. तुम्हाला ताजेतवाने आणि उत्साही वाटेल.
 

Web Title: tender coconut water as weight loss drink

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.