माता-बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कुटुंब कल्याण कार्यक्रम महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:21 AM2021-07-11T04:21:05+5:302021-07-11T04:21:05+5:30

जिल्ह्यात कुटुंब नियोजन पद्धतीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या ...

Family welfare programs are important for the health of mothers and children | माता-बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कुटुंब कल्याण कार्यक्रम महत्त्वाचे

माता-बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कुटुंब कल्याण कार्यक्रम महत्त्वाचे

Next

जिल्ह्यात कुटुंब नियोजन पद्धतीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रभावी माध्यमांचा उपयोग करून २४ जुलैपर्यंत टप्प्याटप्प्याने ‘जागतिक लोकसंख्या दिन’ साजरा करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात २७ जून ते १० जुलैपर्यंत दाम्पत्य संपर्क पंधरवडा, दुसऱ्या टप्प्यात ११ ते २४ जुलै या कालावधीमध्ये लोकसंख्या स्थिरता पंधरवडा राबविण्यात येणार असून, प्रत्यक्ष कुटुंब नियोजनाची सेवा पुरविण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. यावेळी कोरोना नियमांचे पालन करूनच कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या वर्षी जागतिक लोकसंख्या दिनाचे घोषवाक्य ‘संकटकाळातही करूया कुटुंब नियोजनाची तयारी, सक्षम देश व कुटुंबाची ही आहे संपूर्ण जबाबदारी’ असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, गावपातळीवर ‘जागतिक लोकसंख्या दिन’ अतिशय प्रभावीपणे राबविला जाणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले.

Web Title: Family welfare programs are important for the health of mothers and children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.