२०४० मध्ये कदाचित प्यायलाही पाणी नसेल; अभ्यास गटांनी सांगितला पुढचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 05:25 AM2022-03-26T05:25:36+5:302022-03-26T05:27:48+5:30

२०४० पर्यंत सुमारे ४४ देशांत अतिभीषण ते भीषण स्वरूपाची पाणीटंचाई जाणवेल, असे अभ्यास गटांचे निरीक्षण आहे.

Maybe there is no water to drink in 2040 | २०४० मध्ये कदाचित प्यायलाही पाणी नसेल; अभ्यास गटांनी सांगितला पुढचा धोका

२०४० मध्ये कदाचित प्यायलाही पाणी नसेल; अभ्यास गटांनी सांगितला पुढचा धोका

Next

सतत फुगणारी लोकसंख्या, वाढते नागरीकरण, शहरांची भरमसाठ वाढ आणि हवामान बदल या कारणांमुळे जगभरातील पाण्याच्या साठ्यांवर पडणारा ताण वाढत असून, भूजल पातळीच्या बाबतीत आपण जबाबदारीने वागलो नाही, तर २०४० पर्यंत जगाच्या काही भागात प्यायलाही पाणी नाही अशी परिस्थिती ओढवू शकते. २०४० पर्यंत सुमारे ४४ देशांत अतिभीषण ते भीषण स्वरूपाची पाणीटंचाई जाणवेल, असे अभ्यास गटांचे निरीक्षण आहे. हवामान बदलामुळे समुद्र पातळी वाढत राहिली तर समुद्राचे खारे पाणी घुसून पिण्यायोग्य भूजलाची प्रत पूर्ण खालावेल अशीही भीती आहे.

Web Title: Maybe there is no water to drink in 2040

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.