'अशा घटना थांबणार नाहीत, भारताने आम्हाला पाठिंबा द्यावा...', बलुच मानवाधिकार परिषदेची पाकिस्तानला उघड धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 10:00 IST2025-03-13T09:57:40+5:302025-03-13T10:00:19+5:30

लंडनमधील बलुच मानवाधिकार परिषदेच्या माहिती सचिवांनी ट्रेन हायजॅकवर प्रतिक्रिया दिली. या घटनेवर चिंता व्यक्त करताना ते म्हणाले की, या घटनेवरून पाकिस्तान कमकुवत होत चालला आहे हे दिसून येते.

Such incidents will not stop, India should support us Baloch Human Rights Council's open threat to Pakistan | 'अशा घटना थांबणार नाहीत, भारताने आम्हाला पाठिंबा द्यावा...', बलुच मानवाधिकार परिषदेची पाकिस्तानला उघड धमकी

'अशा घटना थांबणार नाहीत, भारताने आम्हाला पाठिंबा द्यावा...', बलुच मानवाधिकार परिषदेची पाकिस्तानला उघड धमकी

दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानातील दहशतवादग्रस्त बलुचिस्तानमध्ये रेल्वे अपहरणाची घटना घडली. जाफर एक्सप्रेस ट्रेनचे अपहरण बलुच बंडखोरांनी केले होते. ट्रेनमध्ये ४४० प्रवासी होते. एकीकडे पाकिस्तानी लष्कराने सर्व अपहरणकर्त्यांच्या सुटकेसह ऑपरेशन पूर्ण झाल्याचा दावा केला आहे, तर दुसरीकडे बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने वेगळाच दावा केला आहे.  अनेक पाकिस्तानी सैनिक अजूनही त्यांच्या ताब्यात असल्याचा दावा बलुचने केला. या घटनेने संपूर्ण जगाचे लक्ष पाकिस्तानकडे वेधले आहे.

ट्रम्प यांचे आश्वासनही कामी आले नाही; सुनीता विल्यम्स अंतराळात पुन्हा अडकल्या, क्रू-10 लाँच झाले नाही

लंडनमधील बलुच मानवाधिकार परिषदेचे माहिती सचिव खुर्शीद अहमद यांनी ट्रेन अपहरणाबद्दल भाष्य केले. या घटनेवर चिंता व्यक्त ते म्हणाले, या घटनेवरून पाकिस्तान कमकुवत होत चालला आहे हे दिसून येते. तर बलुचिस्तानमध्ये बलुच स्वातंत्र्यसैनिक अधिक बळकट होत आहेत.

खुर्शीद अहमद यांनीही बंडखोरांचे कौतुक केले. "अशा कठोर परिस्थितीतही, बलुच स्वातंत्र्यसैनिकांनी मानवी हक्कांचे मानके पाळली आणि वृद्ध, महिला आणि कुटुंबांना क्वेट्टाला परतण्याची परवानगी दिली", असंही अहमद म्हणाले.  त्यांनी अनेक लष्करी कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले आणि बेपत्ता बलुच लोकांच्या सुटकेची मागणी केली. आम्हाला विश्वास आहे की अशा घटना भविष्यात थांबणार नाहीत.

ते पुढे म्हणाले, "आपण बलुचिस्तानमधील पाकिस्तान-चीन प्रकल्पांवर बलुचिस्तान स्वातंत्र्यसैनिक, बीएलए हल्ला करताना पाहत आहोत. बीएलए आपल्या मातृभूमीचे रक्षण करत आहे. बलुचिस्तानमधील परिस्थिती अशी आहे की भारत आणि पाश्चात्य शक्तींनी बलुचिस्तानच्या राष्ट्रीय संघर्षाला पाठिंबा द्यावा, असंही ते म्हणाले. 

पाकिस्तान रेल्वेने रेल्वे अपहरणाबद्दल निवेदन दिले

रेल्वे अपहरणावर पाकिस्तानच्या रेल्वे विभागाचे रेल्वे नियंत्रक मुहम्मद काशिफ यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, नऊ डब्यांची ही ट्रेन बोगदा क्रमांक ८ मध्ये सशस्त्र लोकांनी थांबवली. पाकिस्तान रेल्वेच्या मते, या मार्गावर १७ बोगदे आहेत आणि कठीण भूप्रदेशामुळे गाड्या अनेकदा मंद गतीने जातात. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी या घटनेचा निषेध केला आणि म्हटले की, "निरपराध प्रवाशांवर गोळीबार करणाऱ्या क्रूरांना कोणत्याही प्रकारची दया दाखवता येणार नाही."

Web Title: Such incidents will not stop, India should support us Baloch Human Rights Council's open threat to Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.