सरकार निवडणूक घ्यायला घाबरतंय; महाराष्ट्राचे ५ तुकडे करण्याचा प्रयत्न, आदित्य ठाकरेंची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2023 04:02 PM2023-02-08T16:02:45+5:302023-02-08T16:03:02+5:30

माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

Former minister Aditya Thackeray has criticized the state government. | सरकार निवडणूक घ्यायला घाबरतंय; महाराष्ट्राचे ५ तुकडे करण्याचा प्रयत्न, आदित्य ठाकरेंची टीका

सरकार निवडणूक घ्यायला घाबरतंय; महाराष्ट्राचे ५ तुकडे करण्याचा प्रयत्न, आदित्य ठाकरेंची टीका

googlenewsNext

आपल्या राज्यातून बाहेर उद्योग चालले कसे यावर जनतेसमोर चर्चा करू, असं आव्हान माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला दिलंय. ही चर्चा जिथे तुम्ही करायला तयार आहात तिथे मी येईन, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. शिवसंवाद यात्रेनिमित्त आदित्य ठाकरे हे जालन्यातील सोमठाणा येथे आले होते. यावेळी आयोजित सभेत आदित्य ठाकरेंनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांना हे आव्हान दिलं आहे.

स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके असं हे सरकार आहे. मात्र कुणाचा शो फ्लॉप झाला याचा मी आनंद साजरा करत नाही, असं देखील ते म्हणाले. मुख्यमंत्री हे नाव न घेता ठाकरे कुटुंबावर टीका करत असून ते ठाकरे परिवाराला संपवायला निघाले हे त्यांनी सांगून दाखवावं, असं आव्हान देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. शिवाय महाराष्ट्राचे ५ तुकडे करण्याचं यांच्या मनात आहे, असं सांगत हे सरकार निवडणूक घ्यायला घाबरते, असा टोला त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारला लगावला.

Web Title: Former minister Aditya Thackeray has criticized the state government.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.