जळगावात डेंग्यू सदृष्य आजाराचे २१ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 02:49 PM2018-08-23T14:49:29+5:302018-08-23T14:50:53+5:30

शहरात गेल्या आठवठाभरात सुरु असलेल्या पावसामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ होत आहे. शहरात २१ डेंग्यू सदृष्य आजाराचे रुग्ण आढळून आले

21 cases of Dangue Disease in Jalgaon | जळगावात डेंग्यू सदृष्य आजाराचे २१ रुग्ण

जळगावात डेंग्यू सदृष्य आजाराचे २१ रुग्ण

Next
ठळक मुद्दे१० रुग्णांचे नमुने औरंगाबादला पाठविलेपावसामुळे साथीच्या आजारांची भितीडेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची भिती

जळगाव : शहरात गेल्या आठवठाभरात सुरु असलेल्या पावसामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ होत आहे. शहरात २१ डेंग्यू सदृष्य आजाराचे रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी १० रुग्णांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी औरंगाबाद पाठविण्यात आल्याची माहिती मनपा आरोग्य विभागातील अधिकारी सुधीर सोनवाल यांनी दिली आहे.
भाईटेनगरातील एक सहा वर्षीय बालक, आदर्शनगरातील तरुणासह तब्बल २१ जणांना डेंग्यू सदृश आजार झाला आहे. या सोबतच रक्त तपासणीसाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असल्याचे सांगण्यात येत असून, डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ
जून महिन्यात पावसाने हजेरी लावल्यानंतर मोठा खंड पडला. तसेच जुलैमध्ये पाऊस झाल्यानंतर वातावरणात बदल होऊन अनेकांना व्हायरल इन्फेक्शन झाल्याच्या तक्रारी वाढल्या.
यात अनेकांना पोटदुखी व जुलाबचा त्रास वाढला. भोईटेनगरातील सहा वर्षीय बालकास त्याची लागण झाली होती. तसेच गेल्या आठवड्याभरात जोरदार पावसामुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून मनपा आरोग्य विभागाच्या तपासणीत २१ रुग्णांना डेंग्यू सदृश आजार झाल्याचे आढळून आले आहे. पावसामुळे अनेक ठिंकाणी पाणी साचल्यामुळे डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.
मनपाकडून फवारणी सुरु
मनपा प्रशासनाकडून ज्या भागांमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्या भागांमध्ये धुरळणी व फवारणी सुरु केली आहे. गणपतीनगर, जयनगर यासारख्या उच्चभ्रू रहिवासी भागांसह भोईटेनगरमध्ये डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आल्याने तेथे धुरळणी, फवारणी आणि अ‍ॅबेटिंगचे काम केले जात असल्याची माहिती मनपा मलेरिया निर्मूलन विभागाकडून देण्यात आली आहे.
प्रभागनिहाय फवारणीचे नियोजन नाही
साथीच्या आजारांमध्ये वाढ होत असल्याचा तक्रारी मिळाल्यानंतर आमदार सुरेश भोळे यांनी मनपात आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेवून, शहरात प्रभागनिहाय धुरळणी व फवारणी करण्याचा सूचना दिल्या होत्या. मात्र, अद्याप देखील मनपा आरोग्य विभागाकडून प्रभागनिहाय फवारणीचे नियोजन करण्यात आलेले नाही. दरम्यान, नागरिकांनी आपल्या घराच्या जवळपास कुठेही पाणी साचू देऊ नये, तसेच सेप्टिक टँकच्या गॅस पाईपला जाळी बसवून घ्यावी, असे आवाहन मलेरिया निर्मूलन विभागाने केले आहे.
१० रुग्णांचे नमुने औरंगाबादला रवाना
शहरात आढळलेल्या २१ संशयित रुग्णांपैकी १० रुग्णांच्या रक्तांचे नमुने औरंगाबादला पाठविण्यात आले आहेत. गेल्या वर्षी डेंग्यूमुळे शहरात ८ नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मनपा प्रशासनाने खबरदारी घेवून तत्काळ रुग्णांचे नमुने औरंगाबादा पाठविले आहेत. दोन दिवसात या नमुन्यांचा अहवाल प्राप्त होणार आहेत.

Web Title: 21 cases of Dangue Disease in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.