जळगावच्या ‘सलीम’मुळे वाचले भाविकांचे प्राण

By admin | Published: July 11, 2017 05:42 PM2017-07-11T17:42:43+5:302017-07-11T17:42:43+5:30

अमरथान यात्रा : पिंपरखेड येथून 15 वर्षापूर्वी झाले होते बलसाड येथे स्थाईक

Prana survivors of Jalgaon's Salim have read | जळगावच्या ‘सलीम’मुळे वाचले भाविकांचे प्राण

जळगावच्या ‘सलीम’मुळे वाचले भाविकांचे प्राण

Next

दिलीप पाटील/ ऑनलाईन लोकमत

पिंपरखेड ता. भडगाव,दि.11- अमरनाथ यात्रेला निघालेल्या बसवर 10 रोजी रात्री हल्ला झाला ‘त्या’ बसचा चालक सलीम गफूर पटेल हा मुळचा जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहे. आपल्या प्राणाची पर्वा न करता बस भरधाव नेल्याने अनेकांचे प्राण वाचू शकले. 
बसचालक सलीम जळगाव जिल्ह्यातला
सलीम (वय 27) हा मुळचा भडगाव तालुक्यातील पिंपरखेड  येथील रहिवासी आहे. सलीमचे वडील गफूर पटेल हे कामानिमित्त कुटुंबासह सुमारे 15 वर्षापासून बलसाड (गुजरात) येथे स्थायिक झाले आहेत. त्यांना बबलू, इकबाल, सलीम, आशिक अशी चार मुले आहेत. तीन मुले ड्रायव्हींगचे काम करतात तर सर्वात लहान मुलगा आशिक हा  टेलरींगचे काम करतो. सलीमचा विवाह झाला असून त्यास एक मुलगा व मुलगी आहे. पटेल कुटुंबियांची पिंपरखेड येथे शेती असल्याने यानिमित्ताने येणेजाणे होत असते. 
सलीमच्या भावाने साधला लोकमतशी संवाद
अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या या हल्ल्यात 7 भाविक ठार तर 32 जखमी झाले. बसचालक सलीमचा भाऊ इकबाल याने ‘लोकमत’ शी दूरध्वानीवर माहिती दिली. बस सुरुवातीस सुरक्षा व्यवस्थेत इतर बसेस सोबत होती. मात्र बस पंर झाल्यामुळे ही बस मागे राहिली बसचे पंर टायर बदलल्यानंतर बस मार्गस्थ झाली. रस्त्यात दोन मोटरसायकलस्वार बस जवळून गेले व ते बसला सुरक्षा व्यवस्था नसल्याचे पाहून माघारी परतले. हे सलीमच्या लक्षात आले व त्याने वेगाने बस पुढे नेली. मात्र काही वेळातच अतिरेक्यांनी त्यांना गाठत बसवर गोळीबार केला.  अशा स्थितीतही सलीमने जिवाची पर्वा न करता बस पळवली. या दरम्यान 7 जणांचा मृत्यू झाला मात्र सलीमच्या धाडसामुळे अनेकांचे प्राण वाचू शकले. त्याने घाबरुन जावून बस पळवली नसती तर आणखी अनेकांचे प्राण गेले असते अशी भीती इकबाल यांनी व्यक्त केली.

Web Title: Prana survivors of Jalgaon's Salim have read

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.