आईच्या निधनाचा विरह ; बहीण-भावाने राजाराम तलावात उडी घेऊन जीवन संपवलं!

By उद्धव गोडसे | Published: August 15, 2024 05:04 PM2024-08-15T17:04:30+5:302024-08-15T17:04:53+5:30

कोल्हापुरातील धक्कादायक घटना, सुसाईड नोट मिळाली.

Bereavement of mothers death Brother and sister ended their lives by jumping into Rajaram Lake | आईच्या निधनाचा विरह ; बहीण-भावाने राजाराम तलावात उडी घेऊन जीवन संपवलं!

आईच्या निधनाचा विरह ; बहीण-भावाने राजाराम तलावात उडी घेऊन जीवन संपवलं!

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : आईचे निधन झाल्याने नैराश्यातून बहीण - भावाने राजाराम तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार गुरुवारी (दि. १५) सकाळी दहाच्या सुमारास निदर्शनास आला. भूषण नीळकंठ कुलकर्णी (वय ६१) आणि भाग्यश्री नीळकंठ कुलकर्णी (वय ५७, दोघे रा. नाळे कॉलनी, संभाजीनगर, कोल्हापूर) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. 

राजारामपुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजाराम तलावात गुरुवारी सकाळी दोन मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती काही नागरिकांनी दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन मृतदेह बाहेर काढले. मृतदेहाजवळ सुसाईड नोट मिळाली असून, त्यामध्ये भूषण कुलकर्णी आणि भाग्यश्री कुलकर्णी या भावंडांची नावे आहेत. हे दोघेही अविवाहित असून, अडीच महिन्यांपूर्वी आईचे निधन झाल्याने नैराश्यातून आणि विरह सहन न झाल्याने आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी लिहिले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरे तपासणीसाठी सीपीआर मध्ये पाठवले.

Web Title: Bereavement of mothers death Brother and sister ended their lives by jumping into Rajaram Lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.