राज्यातील २९ साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 12:28 PM2021-06-03T12:28:03+5:302021-06-03T12:36:37+5:30

: राज्यातील ७३ साखर कारखान्यांकडे १२७७ कोटींची एफआरपीची रक्कम थकीत आहे. त्यापैकी २९ कारखान्यांकडे तब्बल ९१३ कोटी रुपये शेतकऱ्यांचे आडकून पडले असून, या कारखान्यांविरोधात साखर आयुक्तांनी साखर जप्तीची कारवाई केली आहे. शंभर टक्के एफआरपी देणारे ११७ कारखाने असून, त्यातील वीस कारखाने हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.

Confiscation action against 29 sugar factories in the state | राज्यातील २९ साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई

राज्यातील २९ साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई

Next
ठळक मुद्देराज्यातील २९ साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई ९१३ कोटींची एफआरपी थकली : शंभर टक्के एफआरपी देण्यात कोल्हापूरच पुढे

कोल्हापूर : राज्यातील ७३ साखर कारखान्यांकडे १२७७ कोटींची एफआरपीची रक्कम थकीत आहे. त्यापैकी २९ कारखान्यांकडे तब्बल ९१३ कोटी रुपये शेतकऱ्यांचे आडकून पडले असून, या कारखान्यांविरोधात साखर आयुक्तांनी साखर जप्तीची कारवाई केली आहे. शंभर टक्के एफआरपी देणारे ११७ कारखाने असून, त्यातील वीस कारखाने हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.

राज्यात यंदा उसाचे मोठे उत्पादन झाल्याने हंगाम एप्रिलपर्यंत हंगाम सुरू राहिला. विशेष म्हणजे पुणे व सोलापूर या विभागात ऊस मोठ्या प्रमाणात पिकल्याने साखरेचे उत्पादनही वाढले आहे. राज्यात हंगाम २०२०-२१ मध्ये गाळप झालेल्या उसाची २३ हजार ३२० कोटी ५७ लाख रुपये देय एफआरपी आहे. त्यापैकी २२ हजार ४३ कोटी १३ लाख रुपये पैसे शेतकऱ्यांना आदा करण्यात आले आहेत.

अद्याप १२७७ कोटी ४४ लाख रुपये एफआरपी शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. एकूण एफआरपी देयचे प्रमाण पाहिले तर ५० टक्क्यांपेक्षा अधिक एफआरपी दिलेले ६८ कारखाने आहेत. ११७ कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी दिलेली असून, त्यातील २० कारखाने हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. त्या शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे पैसे न दिलेल्या २९ कारखान्यांवर साखर जप्तीची कारवाई साखर आयुक्तांनी केली आहे.

एफआरपी देणारे कारखाने -

एफआरपी टक्केवारी   कारखान्यांची संख्या

  • ० टक्के                         १
  • १ ते ४९ टक्के                ४
  • ५० टक्केपेक्षा अधिक  ६८
  • १०० टक्के               ११७

 

  • एकूण १९०
     

सर्वांत कमी एफआरपी देणारे पाच कारखाने

  • पाणगेश्वर, लातूर -० टक्के
  • किसनवीर, खंडाळा - ५ टक्के
  • तासगाव शुगर - २६ टक्के
  • किसनवीर, भुईंज - ३२ टक्के
  • भीमा टाकळी, सोलापूर - ४३ टक्के


दृष्टिक्षेपात यंदाचे साखर उत्पादन,                   लाख टनात -

विभाग           हंगाम २०१९-२०        हंगाम २०२०-२१  जास्त

  • कोल्हापूर           २३.४१६             २७.७४                ४. ३३
  • पुणे                     १७.५२              २५.३३                 ७.८१
  • सोलापूर               ७.१८              १६.४९                 ९.३१
  • अहमदनगर        ५.८७               १६.६९              ११.०२
  • औरंगाबाद          ३.७१                  ९.७०                ५.९९
  • नांदेड                  ३.१२                 ९.४०                 ६.२८
  • अमरावती            ०.४१                ०.५२                ०.११
  • नागपूर              ०.५४५                ०.३९              ०.१५

Web Title: Confiscation action against 29 sugar factories in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.