जानकरांवरची टीका खपवून घेणार नाही
By admin | Published: July 25, 2016 11:59 PM2016-07-25T23:59:42+5:302016-07-26T00:19:42+5:30
मुकुंद पाटील : राष्ट्रीय समाज पक्षाच्या मेळाव्यात ए. वाय. पाटील यांना इशारा
सावरवाडी : राज्यात बहुजनांचे नेतृत्व करणाऱ्या दुग्धमंत्री महादेव जानकर यांच्यावर टीका करण्याचा अधिकार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष ए. वाय. पाटील यांना नाही. स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी जानकरांवर केलेली टीका बहुजन समाजावर असून, ती खपवून घेतली जाणार नाही, असा खणखणीत इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मुंकुंद पाटील यांनी दिला.
कसबा बीड (ता. करवीर) येथील राष्ट्रीय समाज पक्षातर्फे ग्रामीण कार्याकर्त्यांच्या आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच मारुतराव वरुटे होते.राष्ट्रीय सामज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे दुग्धमंत्री महादेव जानकर यांच्या समाजाभिमुख धोरणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानकर यांच्या कार्याचा आढावा तपासला आहे. त्याच्या कार्यातूनच त्यांना मंत्रिपद दिले आहे, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ए. वाय. पाटील यांनी जानकरांच्या विचारांचा सर्वप्रथम अभ्यास करावा, असे सांगून मुकुंद पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय समाज पक्षातर्फे जनजाागरण मोहीम राबविण्यात येणार आहे.मेळाव्यात सागर भोसले (गगनबावडा), साताप्पा पोवार (पुनाळ), शिवाजी सातपुते (पन्हाळा), युवराज राणगे (सावरवाडी), नारायण कांबळे (वाघवे), आदींची भाषणे झाली. अनिल बुवा यांनी प्रास्ताविक व स्वागत, तर राजकुमार पाटील यांनी आभार मानले.
मेळाव्यास करवीर, पन्हाळा, गगनबावडा तालुक्यांतील पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)