अपरिपक्व, प्रसिद्धीसाठी बालिश कृत्यांना महत्त्व देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:16 AM2021-06-29T04:16:59+5:302021-06-29T04:16:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : उथळपणाने अपरिपक्व व प्रसिद्धीसाठी बालिश कृत्ये करणाऱ्यांना विनाकारण महत्त्व देऊ नका. परमेश्वरी कृपेने आपण ...

Don’t value immature, childish acts for publicity | अपरिपक्व, प्रसिद्धीसाठी बालिश कृत्यांना महत्त्व देऊ नका

अपरिपक्व, प्रसिद्धीसाठी बालिश कृत्यांना महत्त्व देऊ नका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : उथळपणाने अपरिपक्व व प्रसिद्धीसाठी बालिश कृत्ये करणाऱ्यांना विनाकारण महत्त्व देऊ नका. परमेश्वरी कृपेने आपण यशोशिखरावर आहोत. जनतेची सेवा करूया, अशी सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना पत्रकातून केली.

मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले, मुरगूड शहरवासीयांना व माता-भगिनींना पाण्यासाठी दाही दिशा फरपट करायला लावणाऱ्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती दिवशीच राधानगरी धरणावर जाऊन तेथील पवित्र भूमी कलंकित करू नये, असे पत्रक मुरगुडच्या कार्यकर्त्यांनी काढले होते.

जिल्हा कोरोना परिस्थितीमध्ये चौथ्या पातळीवर असल्यामुळे सर्वच कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे परवानगी मागितली तरी शासकीय अधिकारी परवानगी देणारच नाहीत. अशी परवानगी दिली तर त्यांच्या नोकऱ्या जातील, हे माहीत असल्यामुळे मुद्दाम परवानगी मागायची. परवानगी मिळणार नाही, हे माहीत असल्यामुळे स्टंटबाजी करायची. त्यानंतर ही परवानगी कोणाच्यातरी सांगण्यावरून दिली नाही, अशीच सहानुभूती मिळवायची. त्यातून प्रसिद्धी मिळवायची. अशा बालिश बुद्धीच्या सल्लागारांचा सल्ला ऐकून अशी कृती करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका.

परमेश्वराने आपल्याला फार मोठी संधी दिलेली आहे. या काळामध्ये आपण जनतेची सेवा करू. त्यांच्या संकटामध्ये धावून जाऊन त्यांना दिलासा देऊया. विकासकामे करण्याची तर अशी सुवर्णसंधी आली आहे, विकासकामे अशी करूया की जनता शंभर वर्षे आपले नाव काढेल. अतिशय विनयाने जनतेला विश्वास देऊया. जनतेने नाकारलेल्यांना दुसरे कोणतेही काम राहिलेले नाही. त्यामुळेच उथळपणाने बालिश व अपरिपक्व कृती केले जाते. नशीब आंबेओहळ प्रकल्पाच्या पाण्याचे पूजन झाले नाही; फक्त वंदनच केले गेले. उच्च न्यायालयात धरणाचे काम थांबवणारे, घळभरणी करू नये असा प्रयत्न करणारे, प्रकल्पग्रस्तांना विनाकारण उचकवून उत्तूर विभागासह कडगाव -गिजवणे विभागातील लोकांना वंचित ठेवणाऱ्यांना त्या भागातील जनता चांगलेच ओळखून आहे. लवकरच धरण पूर्ण भरेल व सर्व कार्यकर्त्यांसोबत त्या पाण्याचे दर्शन लवकरच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते पाण्याचे पूजन करून घेऊ, असेही मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.

गोमूत्र शिंपडणारे माझे कार्यकर्ते असणार नाहीत

राधानगरी धरणावर गोमूत्र वगैरे शिंपडणे असल्या गोष्टी करून त्याना प्रसिद्धीसाठी वाव देऊ नका. जे कोणी असा प्रकार करतील, ते माझे कार्यकर्ते असणार नाहीत, असा दम देत जनता सर्व ओळखून असते. जनता फार हुशार आहे, म्हणूनच २५ वर्षे आपण सत्तेत आहोत. त्यांचा आदर करूया, असा सल्लाही मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना दिला.

Web Title: Don’t value immature, childish acts for publicity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.