सीबीएसई दहावीत यंदा एकही विद्यार्थी होणार नाही नापास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:43 AM2021-02-06T04:43:09+5:302021-02-06T04:43:09+5:30
चौकट काय आहे नवीन नियम सीबीएसईसाठी इंग्रजी, हिंदी, विज्ञान, गणित आणि समाजशास्त्र हे पाच मुख्य विषय आहेत. त्याच्या जोडीला ...
चौकट
काय आहे नवीन नियम
सीबीएसईसाठी इंग्रजी, हिंदी, विज्ञान, गणित आणि समाजशास्त्र हे पाच मुख्य विषय आहेत. त्याच्या जोडीला आता कौशल्य हा विषय देण्यात आला आहे. मुख्य विषयांमधील विज्ञान, गणित, समाजशास्त्र यापैकी एका विषयात विद्यार्थी नापास झाल्यास त्याला सहाव्या कौशल्य विषयातील गुण हे नापास झालेल्या विषयासाठी ग्राह्य धरून त्याला पास केले जाणार असल्याची माहिती पेठवडगाव येथील डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य डॉ. सरदार जाधव यांनी गुरुवारी दिली. औपचारिक शिक्षण आणि कौशल्य विषयाची सांगड घातल्याने विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांचे मनोधैर्य, आत्मविश्वास वाढविण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
प्रतिक्रिया
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने सीबीएसईने चांगला निर्णय घेतला आहे. विज्ञान, गणित विषयांबाबतचा त्यांचा तणाव कमी होण्यास मदत होईल.
-डॉ. वनिता चौगुले, पालक, पेठवडगाव.
सीबीएसईचा हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे. नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी कौशल्य विषयाचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. ‘बेस्ट ऑफ फाईव्ह’मुळे गुणवत्ता, टक्केवारी वाढणार आहे.
-विकास मोहिते, पालक, रूईकर कॉलनी.
चांगला निर्णय आहे. गणित, विज्ञान, समाजशास्त्रपैकी एखाद्या विषयात पास होण्यास अडचण आल्यास या निर्णयामुळे त्याला मदत होईल. कौशल्य विकासादृष्टीने फायदा होणार आहे.
-रोहन जाधव, पालक, मुक्तसैनिक वसाहत
जिल्ह्यातील आकडेवारी दृष्टिक्षेपात
सीबीएसई दहावीच्या शाळा : २८
विद्यार्थी संख्या : ३८००