राज्यात ४ वर्षात २०० वाघ वाढले; वन्यजीव मंडळाचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 08:05 AM2023-05-03T08:05:41+5:302023-05-03T08:06:04+5:30

व्याघ्र प्रकल्पांच्या व्यवस्थापन प्रभावी मूल्यांकनात पेंच व्याघ्र प्रकल्प देशातील पहिल्या दहा प्रकल्पामध्ये आहे.

200 tigers increased in state in 4 years; Congratulations to Wildlife Board from Chief Minister | राज्यात ४ वर्षात २०० वाघ वाढले; वन्यजीव मंडळाचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

राज्यात ४ वर्षात २०० वाघ वाढले; वन्यजीव मंडळाचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

googlenewsNext

मुंबई - राष्ट्रीय स्तरावर गेल्या चार वर्षांत वाघांची संख्या २९६७ वरून ३१६७ झाली आहे. ही वाढ ६.७४ टक्के असून त्या तुलनेत महाराष्ट्रात वाघांच्या संख्येत गेल्या चार वर्षांत २५ टक्के वाढ झाली आहे. 

व्याघ्र प्रकल्पांच्या व्यवस्थापन प्रभावी मूल्यांकनात पेंच व्याघ्र प्रकल्प देशातील पहिल्या दहा प्रकल्पामध्ये आहे. त्याबद्दल मंगळवारी झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. 
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार नागपूर येथून दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. या बैठकीत अभयारण्यातील व पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील, व्याघ्र भ्रमण मार्गातील विकास प्रकल्पांच्या प्रस्तावांवर चर्चा झाली.

Web Title: 200 tigers increased in state in 4 years; Congratulations to Wildlife Board from Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ