शेतकरी कर्जमुक्त करा, 'लाडकी बहीण'सोबत 'लाडका भाऊ' योजना आणा; उद्धव ठाकरेंची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 01:24 PM2024-06-27T13:24:16+5:302024-06-27T13:34:07+5:30
शेतकरी आत्महत्येवरून उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरलं. राज्यात कर्जमुक्ती करण्याची केली मागणी
![Announce debt relief to farmers in the state, Uddhav Thackeray demand, targeting Eknath Shinde-Devendra Fadnavis | शेतकरी कर्जमुक्त करा, 'लाडकी बहीण'सोबत 'लाडका भाऊ' योजना आणा; उद्धव ठाकरेंची मागणी Announce debt relief to farmers in the state, Uddhav Thackeray demand, targeting Eknath Shinde-Devendra Fadnavis | शेतकरी कर्जमुक्त करा, 'लाडकी बहीण'सोबत 'लाडका भाऊ' योजना आणा; उद्धव ठाकरेंची मागणी](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/ut-on-shindes_2024061256553.jpeg)
शेतकरी कर्जमुक्त करा, 'लाडकी बहीण'सोबत 'लाडका भाऊ' योजना आणा; उद्धव ठाकरेंची मागणी
मुंबई - Uddhav Thackeray on Farmers ( Marathi News ) राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, विधानसभा निवडणुकीपूर्वी त्याची अंमलबजावणी करा. त्याचसोबत लाडकी बहीण योजना आणतायेत तसा लाडका भाऊ योजना आणा. महिला-पुरुष भेदभाव करू नका अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवालय येथे पत्रकार परिषद घेत केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यात नव्हे तर देशात एकमेव शेतकरी असेल जो हेलिकॉप्टरने शेतीत जातो आणि पंचतारांकित शेती करतो. विशेषत: अमावस्येला वेगळे पिक घेतात हे आम्ही ऐकलंय असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात करत राज्यात सरासरी ९ शेतकरी आत्महत्या करतायेत. १० हजार २२ कोटी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही. घोषित केलेली आकडेवारी कागदावरच, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत नाही. पीक विम्याचे पैसे नीट मिळत नाही. चित्रविचित्र गोष्टी राज्यात सुरू आहेत. त्यामुळे डबल इंजिन सरकार आलंय, कसंबसं एनडीएचं सरकार दुर्दैवाने आपल्या देशात परत आलंय. नागपूरच्या पहिल्याच अधिवेशनात कुणीही न मागता मी २ लाखांची पीक कर्जाची रक्कम माफ केली होती. त्याप्रमाणे तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर करून निवडणुकीच्या आत त्याची अंमलबजावणी करा असं त्यांनी म्हटलं.
तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील कर्जमुक्तीची घोषणा अद्याप पूर्ण झाली नाही. नुसत्या घोषणा करू नये. अंमलबजावणी करा आणि मग निवडणुकीला सामोरे जा. मंत्र्यांना इतर कामे बरीच आहेत. शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला कुणी तयार नाही. जनतेचा वाली कोणी राहिला नाही. ज्याप्रमाणे मध्य प्रदेशात लाडली बहना अशी योजना आहे तशी राज्यात लाडकी बहीण योजना आणतायेत. मुली मुलांमध्ये भेदभाव करू नका, मुलींप्रमाणेच मुलांनाही योजना आणा. पोलीस भरतीत साडे सतरा हजार जागांसाठी लाखो अर्ज आलेत. भरतीसाठी आलेल्या तरुणांना राहण्याची व्यवस्था नाही. अनेक ठिकाणी सोयीसुविधा नाहीत. बेकारी वाढत चालली आहे असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.
दरम्यान, तुमचं डबल इंजिन सरकारची मदत घेऊ राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले पाहिजे. लाडका भाऊ योजना आणा, माता भगिनींना लाभ देणार तसं भावानांही द्या. महिला कर्तृत्वान झाल्या आहेत. तुम्ही भेदभाव करू नका. महिला पुरुषांमध्ये भेदभाव न करता या योजना आणा. योजनेची चॉकलेट देऊ नका. लोकांची सहनशक्ती संपली आहे. जनता भोळी राहिली नाही. कुणीही यावं गाजर दाखवून काम करून घ्यायचे या गोष्टी जुन्या झाल्या. लाडकी बहीण, लाडका भाऊ आणल्यानंतर त्याची अंमलबजावणी सुधीर मुनगंटीवारांकडे देऊ नका. त्यांचे चंद्रपूरचं भाषण ऐकल्यानंतर अंगावर शहारे येतात.या व्यक्तीकडे अंमलबजावणीची जबाबदारी देऊ नका असा टोलाही उद्धव ठाकरेंनी सरकारला लगावला आहे.
ती भेट योगायोगाने
विधानभवनाच्या लिफ्टमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या भेटीवरही उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलं. लिफ्टमध्ये मी देवेंद्र फडणवीस एकत्र होतो. "ना ना करते प्यार तुम्हीं से कर बैठे" असं काही नाही. योगायोगाने झालेली भेट होती असं उद्धव ठाकरे म्हणाले.