भाजपानेते कुटील !

By admin | Published: February 29, 2016 02:22 AM2016-02-29T02:22:48+5:302016-02-29T02:22:48+5:30

भाजपा घटक पक्षांशीच विश्वासघाताचे राजकारण करीत घणाघाती आरोप शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केला.

BJPnets Kutil! | भाजपानेते कुटील !

भाजपानेते कुटील !

Next

विवेक चांदूरकर/ वाशिम
भाजपाचे नेते कुटील असून, घटक पक्षांशीच विश्‍वासघाताचे राजकारण करीत आहेत. त्या पक्षात बुद्धिवंतांचा भरणा जास्त असून, ते विश्‍वासघाताला मुत्सद्दीपणा समजत आहेत. ज्या राज्यात कुटील कटकारस्थाने होतात, ते राज्य लयास जाते. महाराष्ट्राचेही तेच होणार आहे, असा घणाघाती आरोप शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी शनिवारी वाशिम येथे केला.
शेतकर्‍यांच्या मतांवर हे सरकार सत्तेत आले; मात्र शेतकर्‍यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आम्ही मात्र आमचा मार्ग अवलंबू, असा इशाराही त्यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिला.
देशातील ६0 टक्के जनता ही कृषिव्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे शासनाने शेतीच्या विकासाकडे लक्ष द्यायला हवे; मात्र हे सरकार उद्योगांच्या विकासासाठी 'मेक इन इंडिया' राबवित आहे. ज्याप्रमाणे अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात 'शायनिंग इंडिया'ने भाजपाची अवस्था केली, तीच अवस्था आता 'मेक इन इंडिया'ने होणार आहे, असे ते म्हणाले.

Web Title: BJPnets Kutil!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.