कर्जमाफी ही भाजपाची ‘बनवाबनवी’, आमदार बच्चू कडू यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 03:35 AM2017-09-05T03:35:34+5:302017-09-05T03:36:04+5:30

सरकारने कर्जमाफी करताना शेतकºयांना रांगेत उभे केले़ भाजपा सरकार शेतक-यांशी बनवाबनवी करीत आहे़ बाहेर वाघाची डरकाळी फोडणारी शिवसेना विधानभवनात मांजर होते

 BJP's 'Biyanabavani' and 'Bachu Kadu' criticism of debt relief | कर्जमाफी ही भाजपाची ‘बनवाबनवी’, आमदार बच्चू कडू यांची टीका

कर्जमाफी ही भाजपाची ‘बनवाबनवी’, आमदार बच्चू कडू यांची टीका

Next

श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : सरकारने कर्जमाफी करताना शेतकºयांना रांगेत उभे केले़ भाजपा सरकार शेतक-यांशी बनवाबनवी करीत आहे़ बाहेर वाघाची डरकाळी फोडणारी शिवसेना विधानभवनात मांजर होते, अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी केली.
शेतकºयांना कर्जमाफी देतानाही अटी, शर्ती टाकल्या आहेत. २६ सप्टेंबरपासून सरकारच्या विरोधात एल्गार पुकारणार आहे, असा इशारा त्यांनी दिला. श्रीगोंदा येथे रविवारी झालेल्या एल्गार शेतकरी मेळाव्यात कडू म्हणाले, सध्या कोणत्याच पक्षाला ना ध्येय, ना धोरण आहे़ मंत्रालय हा मंत्री, बिल्डर, अधिकारी यांचा अड्डा बनला आहे़ रासपचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा म्हणाले, सर्वच नेत्यांना मदत केली़ पण त्यांनी फसविण्याचे काम केले़

Web Title:  BJP's 'Biyanabavani' and 'Bachu Kadu' criticism of debt relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी