तीन कुटुंबांवर बहिष्कार

By admin | Published: October 28, 2015 02:24 AM2015-10-28T02:24:46+5:302015-10-28T02:24:46+5:30

एक महिन्यापूर्वी गावातील एका महिलेच्या अंगात भूत शिरले. ती वेड्यागत बरळू लागली. गावातील तीन कुटुंबांवर तिने भुताटकी केल्याचा आळ घेतला.

Boycott of three families | तीन कुटुंबांवर बहिष्कार

तीन कुटुंबांवर बहिष्कार

Next

संतोष कुंडकर, चंद्रपूर
एक महिन्यापूर्वी गावातील एका महिलेच्या अंगात भूत शिरले. ती वेड्यागत बरळू लागली. गावातील तीन कुटुंबांवर तिने भुताटकी केल्याचा आळ घेतला. गावालाही तिची ‘बडबड’ खरी वाटली आणि तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत संपूर्ण गावानेच ‘त्या’ तीन कुटुंबांवर थेट बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही या तालुका मुख्यालयापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या आंबोली या गावात हा खळबळजनक प्रकार घडला आहे. महिन्यापूर्वी गावातील एका महिलेने स्वत:ला भूतबाधा झाल्याचा दावा केला. गावातील गोकुलदास मेश्राम, इंद्रजीत गावतुरे, आनंदराव नन्नावरे या तिघांनी आपल्यावर करणी केली. आपल्या अंगात भूत शिरविले, असा तिने आरोप केला.
गावकऱ्यांनीही कोणतीही खातरजमा न करता, तिन्ही कुटुंबावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. महिनाभरापासून या तीन कुटुंबातील लोकांना गावातील दुकानदार पैसे देऊनही किराणा सामानही देत नाही. शेतीला सिंचनासाठी लागणारे पाणी देणेही गावकऱ्यांनी बंद केले आहे. परिणामी, पीक धोक्यात आले आहे. तीनही कुटुंबांतील सदस्यांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत असून, अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Web Title: Boycott of three families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.