अक्षता पडायच्या बाकी होत्या, नववधू मंडपात म्हणाली, ‘ह्यो नवरा नको गं बाई’  ...अन् नवरदेव गेला परत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 09:30 AM2022-05-12T09:30:29+5:302022-05-12T09:32:48+5:30

bride refuses marriage groom चिमूर तालुक्यातील कोलारी येथील घटना, नातेवाईकांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दुपारचे चार वाजले तरी नववधू लग्नमंडपी आली नाही. त्यामुळे नवरदेवाकडील वऱ्हाडींमध्ये कुजबुज सुरू झाली.

bride said in the marriage hall, i dont want this groom as husband; she is from Nagpur bride reject marriage groom trending strory | अक्षता पडायच्या बाकी होत्या, नववधू मंडपात म्हणाली, ‘ह्यो नवरा नको गं बाई’  ...अन् नवरदेव गेला परत

अक्षता पडायच्या बाकी होत्या, नववधू मंडपात म्हणाली, ‘ह्यो नवरा नको गं बाई’  ...अन् नवरदेव गेला परत

googlenewsNext

- अमोद गौरकार
लोकमत न्यूज नेटवर्क
शंकरपूर (जि. चंद्रपूर) : बँडबाजाच्या पथकात नाचत, वाजत-गाजत नवरदेव लग्नमंडपी आला; परंतु ऐनवेळी भरमंडपात वधू मुलीने लग्नास नकार दिल्याने अखेर नवरदेवाला आल्या पावली परत जावे लागले. ही घटना चिमूर तालुक्यातील शंकरपूरजवळील कोलारी येथे मंगळवारी रात्री घडली.

चिमूर तालुक्यातील उसेगाव येथील एका युवकाचे नागपूर येथील एका मुलीसोबत लग्न जुळले. थाटामाटात साक्षगंधही झाले. मुलीच्या आजोळी कोलारी येथे लग्नकार्य उरकायचे असे बैठकीत ठरले. त्यानुसार कोलारी येथे मंगळवारी लग्न होणार होते. त्यासाठी नवरदेवही उसेगाववरून वऱ्हाडी घेऊन लग्नमंडपी हजर झाला. ढोल-ताशाच्या गजरात आणि मित्रमंडळीच्या नाच-गाण्याच्या तालावर नवरदेवाची एन्ट्री झाली. नवरी मुलगीही मंडपी आली. आता मंगलाष्टके होणार इतक्यात मंडपातच मुलीला चक्कर आल्याने ती खाली पडली. त्यामुळे लगेचच तिला दवाखान्यात नेण्यात आले. दवाखान्यात शुद्धीवर आल्यानंतर नववधूने लग्नमंडपी जाण्यास नकार दिला आणि मला त्या मुलाशी लग्न करायचंच नाही, असे स्पष्टपणे घरच्या मंडळींना सांगितले.

नातेवाईकांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दुपारचे चार वाजले तरी नववधू लग्नमंडपी आली नाही. त्यामुळे नवरदेवाकडील वऱ्हाडींमध्ये कुजबुज सुरू झाली. अखेर नवरीच्या नातेवाईकांकडून मुलीचा लग्नास नकार आहे, असे स्पष्टपणे कळवले. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. नवऱ्या मुलाने यावर तोडगा काढावा म्हणून तंटामुक्तीकडे अर्ज सादर केला. तंटामुक्तीच्या सभेत मुलीने लग्न करण्यास स्पष्टपणे नकार दिल्याने नवरदेवाला परत फिरावे लागले.

जेवणावळी आणि आंदण
लग्न कार्य असल्याने वऱ्हाडींसाठी स्वयंपाक बनविला होता; परंतु लग्न कार्य होणार नसल्याने जेवण तरी कसे करावे, असा प्रश्न निर्माण झाला, परंतु अन्न हे पूर्ण ब्रह्म असल्याने अखेर वऱ्हाडींनी जेवण केले. गावातील लोकांनी व नातेवाईकांनी मुलीच्या सुखी संसारासाठी आणलेल्या भेटवस्तू नातेवाईकांना परत न्याव्या लागल्या.

Web Title: bride said in the marriage hall, i dont want this groom as husband; she is from Nagpur bride reject marriage groom trending strory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न