भाजपानं हातात बांगड्या भरलेल्या नाहीत - फडणवीसांचं शिवसेनेच्या अरे ला का रे

By admin | Published: October 30, 2015 05:07 PM2015-10-30T17:07:56+5:302015-10-30T17:07:56+5:30

शिवसेनेची संस्कृती गुंडगिरीची राहिलेली असल्याचे सांगत आम्हीही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत, असे उद्गार देवेंद्र फडणवीसांनी कल्याणमध्ये कार्यकर्ता सभेत काढले.

The bungalows are not filled with bundles - Fadnavis Shiva's Hey La | भाजपानं हातात बांगड्या भरलेल्या नाहीत - फडणवीसांचं शिवसेनेच्या अरे ला का रे

भाजपानं हातात बांगड्या भरलेल्या नाहीत - फडणवीसांचं शिवसेनेच्या अरे ला का रे

Next
>ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. ३० - शिवसेनेची संस्कृती गुंडगिरीची राहिलेली असल्याचे सांगत आम्हीही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत, परंतु कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शांत असल्याचे उद्गार देवेंद्र फडणवीसांनी कल्याणमध्ये कार्यकर्ता सभेत काढले.
राज ठाकरे, उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका करताना आमची बुलेटची संस्कृती नाहीये बॅलटची असल्याचं फडणवीस म्हणाले. 
 
फडणवीसांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे:
 
- ज्यावेळी इंदिरा गांधीनी आणिबाणी लादली नाही त्यावेळी जनसंघाचे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक जेलमध्ये होते, माझे वडील दोन वर्ष जेलमध्ये होते, त्यावेळी तुम्ही कुठे होतात असा प्रश्न शिवसेनेला फडणवीसांनी विचारला.
- दाऊदचा नातेवाईक असलेल्या मियाँदादला जेवायला घालताना राष्ट्रवाद कुठे गेला होता, तो गुलाम अलींच्यावेळी का उफाळून आला, ते ही निवडणुकांच्या वेळीच.
- वाघाचा पंजा आम्हाला नाही दाखवायचा, तो काँग्रेसला राष्ट्रवादीला दाखवा. आम्ही वाघाच्या जबड्यात हात घालणारी माणसं आहोत.
- आम्ही केलेल्या कामांचं प्रेझेंटेशन राज ठाकरे करताहेत, ते कार्टून काढायचे माहीत होतं, उद्धव ठाकरे फोटो काढायचे आता राज ठाकरे आमच्या कामाचे फोटो काढून स्वत:ची कामं म्हणून दाखवतात.
- नाशिकचा कायापालट राज्य सरकारने केला आणि हे आम्हीच नाही तर अमेरिकेच्या संस्थेनी मान्य केलं आणि तिकडे बोलावून सत्कार केला. विक्रमी वेळेत आम्ही घाट बांधले, रस्ते बांधले.
- नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी खर्च करण्यासाठी महापालिकेकडे छदाम नव्हता, राज्य सरकारने २,५०० कोटी रुपये खर्च केले, परंतु राज ठाकरे आमच्या कामांचं प्रदर्शन स्वत:ची कामं म्हणून करत आहेत.
- नाशिकचा तुम्ही विकास केलात हे खरं असेल, तर तुमचा एकही आमदार का निवडून आला नाही.
- पंधरा वर्षात कल्याण डोंबिवलीच्या केलेल्या सत्यानाशाची जबाबदारी शिवसेनेचीच आहे.
- शिवसेनेनं भाजपाच्या कार्यकर्त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला, एकाला तर पळवलं व बेदम मारहाण केली. अटक टाळण्यासाठी आता ते उलटा कांगावा करताहेत. आपण बांगड्या भरलेल्या नाहीयेत, पण भाजपा कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा.
- एकनाथ शिंदेंनी राजीनाम्याचं नाटक केलंय, शिवसेना ही नाटक कंपनी.

Web Title: The bungalows are not filled with bundles - Fadnavis Shiva's Hey La

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.