मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडणार नाही

By admin | Published: July 28, 2014 04:17 AM2014-07-28T04:17:48+5:302014-07-28T04:17:48+5:30

मंत्रिपदे सोडा, आघाडीत संपूर्ण मंत्रिमंडळ वाट्याला आले तरी मुख्यमंत्रिपदावरील दावा राष्ट्रवादी सोडणार नाही

The claim on the Chief Minister will not leave | मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडणार नाही

मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडणार नाही

Next

वर्धा : मंत्रिपदे सोडा, आघाडीत संपूर्ण मंत्रिमंडळ वाट्याला आले तरी मुख्यमंत्रिपदावरील दावा राष्ट्रवादी सोडणार नाही, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रविवारी वर्ध्यात मांडली.
१४४ जागांच्या भूमिकेवर राष्ट्रवादी ठाम आहे. तशी अटीतटीची वेळ आल्यास पक्षाचे नेते शरद पवार आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या पातळीवर हा मुद्दा निकालात काढला जाईल, असे सूतोवाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वेळी केले. विद्यमान अपक्ष आमदार राष्ट्रवादी वा काँग्रेसच्या संपर्कात असेल तर त्यांना त्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढण्याबाबत विचारमंथन सुरू आहे. या अनुषंगाने वर्धा विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी दावा करण्याची शक्यता आहे.

Web Title: The claim on the Chief Minister will not leave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.