CM फडणवीसांनी केले मनोज जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत; म्हणाले, “निश्चित मागण्या मान्य...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 20:43 IST2025-01-30T20:42:05+5:302025-01-30T20:43:55+5:30

CM Devendra Fadnavis First Reaction On Manoj Jarange Patil Decision: मागण्यांची लवकर अंमलबजावणी न झाल्यास मुंबईच्या आंदोलनाची तारीख जाहीर करेन. तेव्हा मुंबई ठप्प होऊ शकते, मुंबईत आंदोलन सुरू केले तर तिथून काही मराठे माघार घेणार नाहीत, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

cm devendra fadnavis first reaction over manoj jarange patil stop fasting agitation on maratha reservation issue | CM फडणवीसांनी केले मनोज जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत; म्हणाले, “निश्चित मागण्या मान्य...”

CM फडणवीसांनी केले मनोज जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत; म्हणाले, “निश्चित मागण्या मान्य...”

CM Devendra Fadnavis First Reaction On Manoj Jarange Patil Decision: पावणे दोन वर्ष मी सहन केले. मी फडणवीसांना उत्तर मागितले होते, पण त्यांनी काही दिले नाही. ८ मागण्या केल्या त्या पूर्ण करणार की नाही? मराठ्यांच्या मागणीची अंमलबजावणी केली नाही तर मी सरकारला सुखी राहू देणार नाही. मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही तर मुंबईला येण्याची तारीख घोषित करेन. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आपण सामूहिक उपोषण केले. इतके दिवस बसावे लागेल वाटले नाही, असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी सुरू असलेले उपोषण स्थगित केले. उपोषण मागे घेत असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली. 

बीड प्रकरण लावून धरणाऱ्या सुरेश धस यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि सरकारकडून देण्यात आलेल्या आश्वासनांची यादी वाचून दाखवली. देवेंद्र फडणवीस मराठ्यांशी १०० टक्के गद्दारी करणार नाही. ते आमच्या मागण्या मान्य करतील जर नाही केले तर लवकरच आम्ही मुंबईला येण्याची तारीख जाहीर करू. यावेळी मुंबई जाम होऊ शकते, मराठे माघारी येऊ शकत नाही. आमच्या लेकराला नख लागू देऊ नका. जर पोरं बिथरले तर आमदार, खासदारांना हाणतील, मराठ्यांनी एकदा निर्णय घेतला तर माघारी घेणार नाही, असा इशारा देताना आंदोलनाची पुढील दिशा काय असू शकेल, याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी सूतोवाच केले. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले मनोज जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेथे प्रचारसभा, बैठका घेत आहेत. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेण्याच्या निर्णयाबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. यावर बोलताना, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले याचा आनंद आहे. आम्ही मराठा समाजाच्या संदर्भात जे काही निर्णय घेतले आहेत, ते महायुतीच्या सरकारनेच घेतले आहेत. हे सगळे निर्माण झालेले प्रश्न कायद्याच्या चौकटीत सोडवणे ही आमची जबाबदारी आहे, आम्ही तो प्रयत्न करत आहोत. कायद्याच्या चौकटीतील ज्या मागण्या ते करतील किंवा कोणीही करेल, त्या मागण्या आम्ही निश्चित मान्य करू. पण आमचे म्हणणे एवढेच आहे की, भारताचे संविधान आणि कायदा यांच्या चौकटीतील मागण्या असल्या पाहिजेत. त्या असल्या तर योग्य प्रतिसाद सरकारकडून मिळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यांपासून लढा देत असलेले नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. भाजपा आमदार सुरेश धस यांनी त्यांना ज्यूस देऊन हे उपोषण सोडवले. तसेच मुंबई उच्च न्यायालयात सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात मराठा आरक्षण कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील सुनावणी नव्याने घेतली जाणार असल्याने आता मराठा आंदोलनाची पुढील दिशा नेमकी कशी असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

 

Web Title: cm devendra fadnavis first reaction over manoj jarange patil stop fasting agitation on maratha reservation issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.