Maharashtra Politics: “भ्रष्टाचारी लोकांनाच भ्रष्टाचार दिसतो, भाजपकडून ‘भारत जोडो यात्रे’बाबत गैरसमज पसवला जातोय”

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 02:46 PM2022-11-09T14:46:07+5:302022-11-09T14:46:52+5:30

Maharashtra News: भारत जोडो यात्रा आता लोकचळवळ झाली आहे, हा इव्हेंट नाही, असा पलटवार काँग्रेसने भाजपच्या टीकेवर केला आहे.

congress nana patole replied bjp over criticism on rahul gandhi bharat jodo yatra | Maharashtra Politics: “भ्रष्टाचारी लोकांनाच भ्रष्टाचार दिसतो, भाजपकडून ‘भारत जोडो यात्रे’बाबत गैरसमज पसवला जातोय”

Maharashtra Politics: “भ्रष्टाचारी लोकांनाच भ्रष्टाचार दिसतो, भाजपकडून ‘भारत जोडो यात्रे’बाबत गैरसमज पसवला जातोय”

googlenewsNext

Maharashtra Politics: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रात आली आहे. या यात्रेला अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही प्रचंड प्रतिसाद लाभत असल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत ६३ दिवस, ६ राज्ये व २७ जिल्ह्यातून ही पदयात्रा मार्गक्रमण करत पदयात्रेचे अर्धे अंतर पार केलेले आहे. पदयात्रेला मिळालेला प्रतिसाद पक्ष संघटना बळकट होण्यास मदत होत आहे. लोकांमध्ये राहुलजी गांधी यांच्या पदयात्रेबद्दल मोठा उत्साह दिसून येत आहे. काँग्रेसचे समर्थकच नाही तर विरोधकही या पदयात्रेला पाठिंबा देत आहेत. भ्रष्टाचारी लोकांनाच भ्रष्टाचार दिसतो, भाजपकडून ‘भारत जोडो यात्रे’बाबत गैरसमज पसवला जात आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. 

महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा सुरू असून, यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भारत जोडो यात्रा निघाल्यापासून भारतीय जनता पक्ष टीका करत गैरसमज पसरवण्याचे काम करत आहे पण त्याकडे फारसे लक्ष देण्याचे गरज नाही. ‘भ्रष्टाचारी लोकांनाच भ्रष्टाचार दिसतो’ असा प्रतिटोला त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला. पदयात्रेत तरुणांची संख्या लक्षणीय आहे. राहुल गांधी या पदयात्रेच्या माध्यमातून जनतेच्या भावना समजून घेत आहेत. ही मुव्हमेंट आहे इव्हेंट नाही, या शब्दांत नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला.

भारत जोडो यात्रा आता लोकचळवळ झाली आहे

यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, ही पदयात्रा वेगाने व जनतेच्या मोठ्या प्रतिसादाने पुढे जात आहे. जनतेचा, लोकांचा सहभाग वाढत असून आता ही लोकचळवळ झाली आहे. नांदेड जिल्ह्यात पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान घेण्यात येणाऱ्या सभेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे आदित्य ठाकरे सहभागी होत आहेत, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली. 

दरम्यान, देशभरातील १४० भारतयात्रींमध्ये या पदयात्रेत राहुलजी गांधी यांच्याबरोबर कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सहभागी आहेत. महाराष्ट्रातील ९ भारतयात्री सहभागी आहेत. डॉ.  मनोज उपाध्याय, नवी मुंबई, नंदा म्हात्रे, रायगड, आतिषा पैठणकर, नाशिक, रोशनलाल बिट्टू, चंद्रपूर, पिंकी राजपूत, नागपूर, प्रेरणा गौर, चंद्रपूर, श्रवण रपनवाड, नांदेड, महेंद्र बोहरा, नागपूर व वैष्णवी भारद्वाज, नागपूर हे भारत यात्री सहभागी आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: congress nana patole replied bjp over criticism on rahul gandhi bharat jodo yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.