CoronaVirus चिंताजनक! राज्यात सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्या १२०० पार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 22:53 IST2020-05-07T22:31:59+5:302020-05-07T22:53:48+5:30
आजपर्यंत मुंबई आणि राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये १००-२०० चा फरक होता.

CoronaVirus चिंताजनक! राज्यात सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्या १२०० पार
मुंबई : कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. काल १२०० चा आकडा पार केल्याने चिंतेचे वातावरण असताना आजही राज्यभरात १२१६ नवे रुग्ण सापडले आहेत. एकट्या मुंबईचा वाटा निम्म्याहून अधिक आहे.
आजपर्यंत मुंबई आणि राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये १००-२०० चा फरक होता. मात्र, राज्याचा हा आकडा गेल्या दोन दिवसांत कमालीचा वाढला असून थेट दुप्पटीवर गेला आहे. यामुळे राज्यासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १७९७४ झाली असून ४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज २०७ रुग्णांना बरे जाल्याने घरी पाठविण्यात आले आहे.
आज राज्यात ४३ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २४, पुण्यातील ७ , वसई विरार मध्ये ५, सोलापूर शहरात २, अकोला शहरात १, पालघरमध्ये १ आणि औरंगाबाद शहरात १ मृत्यू झाला आहे. याशिवाय मणिपूरमधील १ आणि बिहारमधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईमध्ये झाला आहे. आजपर्यंत राज्यातून ३३०१ रुग्णांना ते बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या...
धोक्याची घंटा! राज्याच्या निम्मे नवे रुग्ण एकट्या मुंबईत; चिंतेत वाढ
मुलायमसिंह यादव आयसीयूमध्ये; बुधवारी रात्री तब्येत बिघडली
लॉकडाऊनमध्ये मद्यसाठ्यात तफावत; भाजपा आमदार पत्नीच्या दुकानाचा परवाना रद्द
रहस्यमय...! भारतातील शेवटचे गाव; जिथे आजही महाभारतातील पूल अस्तित्वात
अख्खा देश कोरोनाच्या धास्तीने घरात असताना परदेशी पर्यटकांकडून किनाऱ्यावर मौजमजा