अभियांत्रिकी शाखेचे ‘बुरे दिन’

By admin | Published: July 29, 2014 12:47 AM2014-07-29T00:47:53+5:302014-07-29T00:47:53+5:30

अगोदरच अभियांत्रिकी शाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी होत असताना, यंदा तर महाविद्यालयांसमोर ‘दुष्काळात तेरावा महिना’अशी स्थिती निर्माण झाली आहे. ‘डीटीई’तर्फे (डायरेक्टोरेट आॅफ टेक्निकल एज्युकेशन)

Engineering Branch's 'Bad Day' | अभियांत्रिकी शाखेचे ‘बुरे दिन’

अभियांत्रिकी शाखेचे ‘बुरे दिन’

Next

दुसऱ्या फेरीअखेर केवळ ३५ टक्के प्रवेश : १० हजारांवर जागा रिक्त राहण्याची भीती
नागपूर : अगोदरच अभियांत्रिकी शाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी होत असताना, यंदा तर महाविद्यालयांसमोर ‘दुष्काळात तेरावा महिना’अशी स्थिती निर्माण झाली आहे. ‘डीटीई’तर्फे (डायरेक्टोरेट आॅफ टेक्निकल एज्युकेशन) राबविण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेमध्ये ‘कॅप’च्या (सेंट्रलाईज अ‍ॅडमिशन प्रोसेस) दुसऱ्या फेरीअखेर महाविद्यालयांमध्ये केवळ ३५ टक्के जागांवर प्रवेश झाले आहेत. तर ‘कॅप’मध्ये समाविष्ट असलेल्या जागांपैकी केवळ ४२ टक्के जागा भरल्या गेल्या आहेत. सध्याची एकूण स्थिती पाहता अंतिम फेरीअखेर १० ते १२ हजारांवर जागा रिक्त राहतात की काय, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बारावीच्या निकालाची टक्केवारी वाढल्यामुळे यंदा प्रवेश चांगल्या प्रमाणात होतील, ही महाविद्यालयांची अपेक्षा ‘कॅप’च्या (सेंट्रलाईज अ‍ॅडमिशन प्रोसेस) दुसऱ्या फेरीतदेखील फोल ठरली आहे. पहिल्या फेरीत नागपूर विभागातील केवळ साडेसहा हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. दुसऱ्या फेरीत चांगले प्रवेश होतील, अशी आशा होती.
आजपासून समुपदेशन फेरी
दरम्यान, रिक्त जागांवर प्रवेशासाठी मंगळवारपासून राज्यभरात समुपदेशन फेरी राबविण्यात येणार आहे. या फेरीसाठी नागपूर विभागात शासकीय तंत्रनिकेतन येथे प्रवेश होतील. ३१ जुलैपर्यंत ही फेरी चालेल.

Web Title: Engineering Branch's 'Bad Day'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.