हंडाभर पाण्यासाठी गमावला जीव!

By admin | Published: April 1, 2016 01:31 AM2016-04-01T01:31:46+5:302016-04-01T01:31:46+5:30

पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेलेल्या युवतीचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. वाल्मिक पठारावरील असवलेवाडी (ता. पाटण) येथे बुधवारी रात्री ही घटना घडली.

Evergreens have lost their water! | हंडाभर पाण्यासाठी गमावला जीव!

हंडाभर पाण्यासाठी गमावला जीव!

Next

सणबूर (जि. सातारा) : पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेलेल्या युवतीचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. वाल्मिक पठारावरील असवलेवाडी (ता. पाटण) येथे बुधवारी रात्री ही घटना घडली. कमल उत्तम असवले (२१) असे मृत युवतीचे नाव आहे.
असवलेवाडी या दुर्लक्षित गावात सध्या पाण्याची तीव्र टंचाई असून, ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठीही गावाबाहेरच्या विहिरीवर जावे लागत आहे. बुधवारी सायंकाळी कमल आणि अन्य काही मुली या विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या.
सुरुवातीला कमल विहिरीत उतरली. तिने कळशी भरून घेतली. मात्र, त्याच वेळी तोल गेल्याने ती पाण्यात पडली. त्यामुळे काठावर थांबलेल्या मुली आरडाओरडा करीत गावाकडे धावल्या. ग्रामस्थही तातडीने त्या ठिकाणी धावले. मात्र, तोपर्यंत कमल बुडाली होती. ग्रामस्थांनी गळ टाकून विहिरीत शोध घेतला असता, कमलचा मृतदेह आढळून आला. (वार्ताहर)

Web Title: Evergreens have lost their water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.