थोर स्वातंत्र्यसैनिक भि.दा.भिलारे गुरुजींचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 01:40 AM2017-07-20T01:40:17+5:302017-07-20T01:40:17+5:30

महात्मा गांधींवर झालेला खुनी हल्ला परतवून लावणारे जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक, माजी आमदार भिकू दाजी भिलारे ऊर्फ भि. दा. भिलारे गुरुजी यांचे (वय ९८) बुधवारी पहाटे

Great freedom fighter Shri Bhilare Guruji passed away | थोर स्वातंत्र्यसैनिक भि.दा.भिलारे गुरुजींचे निधन

थोर स्वातंत्र्यसैनिक भि.दा.भिलारे गुरुजींचे निधन

googlenewsNext

- लोकमत न्यूज नेटवर्क
पाचगणी (जि. सातारा) : महात्मा गांधींवर झालेला खुनी हल्ला परतवून लावणारे जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक, माजी आमदार भिकू दाजी भिलारे ऊर्फ भि. दा. भिलारे गुरुजी यांचे (वय ९८) बुधवारी पहाटे तीन वाजता मुुंबई येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. भिलार (ता. महाबळेश्वर) या त्यांच्या मूळ गावी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले, पाच मुली, सुना ,पुतणे, नातवडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे.
२६ नोव्हेंबर १९१९ रोजी भिलार येथील मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या भि. दा. भिलारे गुरुजी यांनी दुर्गम महाबळेश्वर परिसरात सामाजिक जीवनाचा श्रीगणेशा केला. सातवीपर्यंतचे शिक्षण घेऊन त्यांनी विद्यादानाच्या कार्यात झोकून दिले. महात्मा गांधींच्या विचारातून प्रेरणा घेऊन ते स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय झाले. दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण, आबासाहेब वीर यांचे ते विश्वासू सहकारी होते. महाबळेश्वर, वाई व जावळी तालुक्यांतील ९३ गावांचा ग्रामोन्नती संघ स्थापन करून अनिष्ठ रुढी, अंधश्रद्धा आणि अस्पृश्यता निवारणाचे कार्य त्यांनी केले. महात्मा जोतिबा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. गुरुजींच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्याकरिता महात्मा गांधी हे महाबळेश्वर येथे आले होते.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जिल्हा काँग्रेस कमिटीचे ते सक्रिय सभासद होते. जिल्हाध्यक्षपदाची धुराही त्यांनी अनेक वर्षे सांभाळली. १९६२ ते १९७२ या कालावधीत ते जावळी मतदारसंघाचे आमदार होते. १९७८ ते १९८० दरम्यान विधानपरिषदेचे सदस्य होते. सातारा जिल्ह्याच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

महात्मा गांधींच्या हत्येचा कट उधळला
१९४४ मध्ये महात्मा गांधी पाचगणीत आले होते. त्यावेळी प्रार्थनेच्या वेळी नथुराम गोडसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महात्मा गांधीजींवर केलेला खुनी हल्ला परतवण्यात भिलारे गुरुजी आघाडीवर होते. हल्ल््यासाठी पुढे आलेल्या व्यक्तीच्या हातातील सुरा गुरुजींनी हिसकावून घेतल्याने अनर्थ टळला होता.

Web Title: Great freedom fighter Shri Bhilare Guruji passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.