Jitendra Awhad : "...मागेल त्याला बुलेट प्रूफ जॅकेट"; गोळीबारावरून जितेंद्र आव्हाडांचा जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 10:21 AM2024-02-09T10:21:24+5:302024-02-09T10:26:40+5:30

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांनी राज्यातील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Jitendra Awhad Slams maharashtra government Over abhishek ghosalkar killed in firing | Jitendra Awhad : "...मागेल त्याला बुलेट प्रूफ जॅकेट"; गोळीबारावरून जितेंद्र आव्हाडांचा जोरदार हल्लाबोल

Jitendra Awhad : "...मागेल त्याला बुलेट प्रूफ जॅकेट"; गोळीबारावरून जितेंद्र आव्हाडांचा जोरदार हल्लाबोल

मुंबईत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये अभिषेक घोसाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अभिषेक हे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आहेत. याच दरम्यान, हल्लेखोर मॉरिसनेही स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. यावरून जितेंद्र आव्हाड यांनी राज्यातील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "महाराष्ट्र सरकारची अभिनव योजना मागेल त्याला बुलेट प्रूफ जॅकेट" असं म्हणत निशाणा साधला आहे. 

"सरकार कुणाचंही असो पुरोगामी महाराष्ट्राची वाटचाल युपी/बिहारच्या दिशेने होणं ही इथल्या प्रत्येकासाठी शरमेची बाब आहे. जिथे राजकीय नेत्यांवर उघडपणे गोळीबार होतोय तिथे जनतेच्या सुरक्षेची काय गॅरंटी असणार..?" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "महाराष्ट्राचा बिहार झाला, असे म्हणण्यात आता काहीच अर्थ उरला नाही. कारण, महाराष्ट्राने बिहारला खूप मागे सोडलं आहे. गुंडांनी जणू काही महाराष्ट्र आपल्या मुठीत बंदिस्त करून टाकला आहे. हतबल सरकार उघड्या डोळ्यांनी सारं काही पाहतंय."

"पोलिसांची दहशतच संपली आहे. पोलीस दलात होणाऱ्या हस्तक्षेपामुळे पोलिसांनाही मर्यादा येत आहेत. पोलिसांवर फक्त विरोधकांना संपवण्याची जबाबदारी आहे; कायदा आणि सुव्यवस्था गेली खड्ड्यात!  दुर्देवं आहे, महाराष्ट्राचे! इतक्या घटना घडूनही सरकारला लाज कशी वाटत नाही. जनता हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघतेय; जनतेमधील रोष वाढतोय. पण, लोकांचा जीव जाणे, याला सरकारच जबाबदार आहे, हे सरकारने लक्षात घ्यावे. परवा कल्याण, आज मुंबई... अजून काय माहित किती घटना घडणार आहेत? कधी पुणे, कधी ठाणे तर कधी मुंबई  खुनांचा थरार सुरूच आहे."

"महाराष्ट्रात लागोपाठ उघडपणे गोळीबाराच्या घटना घडणं, ही अतिशय गंभीर बाब आहे. ‘सागर’ बंगल्यावर बसलेल्या गृहमंत्र्यांचं महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष आहे की नाही असा प्रश्न पडतो. सरकार कुणाचंही असो पुरोगामी महाराष्ट्राची वाटचाल युपी/बिहारच्या दिशेने होणं ही इथल्या प्रत्येकासाठी शरमेची बाब आहे. जिथे राजकीय नेत्यांवर उघडपणे गोळीबार होतोय तिथे जनतेच्या सुरक्षेची काय गॅरंटी असणार..?" असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. 

Web Title: Jitendra Awhad Slams maharashtra government Over abhishek ghosalkar killed in firing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.