शहरांत गरिबांसाठी दोन कोटी घरांची कमतरता

By Admin | Published: March 6, 2016 03:49 AM2016-03-06T03:49:27+5:302016-03-06T03:49:27+5:30

केंद्र सरकारने राजीव आवास योजना बंद केली असून, तिचा समावेश पंतप्रधान आवास योजना-सर्वांसाठी घरे मध्ये करण्यात आला आहे. मात्र शहरी गरीबांची घरे आवश्यकतेपेक्षा दोन कोटींनी कमी आहेत.

Lack of two crore houses for the poor in cities | शहरांत गरिबांसाठी दोन कोटी घरांची कमतरता

शहरांत गरिबांसाठी दोन कोटी घरांची कमतरता

googlenewsNext

प्रमोद गवळी,  नवी दिल्ली
केंद्र सरकारने राजीव आवास योजना बंद केली असून, तिचा समावेश पंतप्रधान आवास योजना-सर्वांसाठी घरे मध्ये करण्यात आला आहे. मात्र शहरी गरीबांची घरे आवश्यकतेपेक्षा दोन कोटींनी कमी आहेत.
गृहनिर्माण व शहरी गरीबी मदत राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी राज्यसभेत ही माहिती दिली. खा. विजय दर्डा यांनी संबंधित प्रश्न विचारला होता. बाबुल सुप्रियो म्हणाले की, बाराव्या पंचवाषिंक योजनेत १ कोटी ८0 लाख घरांची कमतरता असेल, असे गृहित होते. मात्र झोपडपट्टीतही न राहणाऱ्या शहरी गरिबांची संख्या लक्षात घेता आवश्यक घरांची संख्या दोन कोटींवर गेली आहे. ते म्हणाले की, जून २0१५ मध्ये पंतप्रधान आवास योजना सुरू करण्यात आली. त्यात घरांसाठी भूखंड, कर्ज व सबसिडी, सरकार व संबंधित व्यक्ती यांच्यात घरबांधणीत भागीदारी आणि लाभार्थीने स्वत: घरबांधणी करणे अशा चार बाबींचा समावेश आहे.
राजीव आवास योजनेखाली सुरुवातीला ७७२ कोटी ४५ लाख रुपये खर्च करून १८३ गृहबांधणी प्रकल्प सुरू आहेत. त्यात १ लाख ४१ हजार ८४८ घरे बांधली जात आहेत. या योजनेसाठी केंद्र सरकारनेही ३६0६ कोटी रुपये दिले होते.

Web Title: Lack of two crore houses for the poor in cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.