प्रेम प्रकरणातून तरूणावर हल्ला, गावात तणाव

By admin | Published: October 31, 2016 11:34 PM2016-10-31T23:34:29+5:302016-10-31T23:34:29+5:30

कागल तालुक्यातील नानीबाई चिखली येथे दोन समाजातील कुटुंबामध्ये तरुण तरुणीच्या प्रेम प्रकरणातून प्रचंड राडा झाला. एका समाजातील आठ ते दहा जणांनी दुसऱ्या समाजातील तरुणाला

Love affair with youth, village tension | प्रेम प्रकरणातून तरूणावर हल्ला, गावात तणाव

प्रेम प्रकरणातून तरूणावर हल्ला, गावात तणाव

Next

ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर, दि. 31 - कागल तालुक्यातील नानीबाई चिखली येथे दोन समाजातील कुटुंबामध्ये तरुण-तरुणीच्या प्रेम प्रकरणातून प्रचंड राडा झाला. एका समाजातील आठ ते दहा जणांनी दुसऱ्या समाजातील तरुणाला त्याच्या कार्यालयात जावून बेदम मारहाण केली. यावेळी दिवाळीच्या लक्ष्मी पूजनासाठी वापरलेले साहित्य ही या जमावाने अस्ताव्यस्त पसरले. ही घटना गावात समजताच गावातील तरुण संतप्त झाले. मारहाण झालेल्या तरुणाने मुरगुड पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार रात्री चौघांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत, मिळालेली माहिती, चिखली मधील सुशांत प्रकाश चौगले वय 28 याचे त्याच गावातील एका युवती बरोबर प्रेम प्रकरण गेल्या चार वर्षांपासून सुरु होते. दोघांच्या घरच्यांकडून याला विरोध होता. मुलीकडील लोकांनी  सुशांतला वेळोवेळी ताकिद दिली होती . तरीही हे प्रकरण सुरूच होते. आज सुशांत सकाळी गावामध्ये असणाऱ्या त्याच्या कार्यालयात बसला असता मुलीच्या कुटुंबियांनी त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये सुशांतला डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे . गावातील संतप्त लोकांना समजावत असताना पोलिसांकडून चुकीचे शब्द वापरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून यामुळे तरुण अधिक संतप्त झाले. त्यांनी दगडफेक केली यात राही पोलिसांना किरकोळ दुखापत झाली आहे. रात्री गावामध्ये प्रचंड तणावपूर्ण वातावरण होते, तसेच पोलिसांनी जादा कुमक तैनात केली आहे.

Web Title: Love affair with youth, village tension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.