Maharashtra Political Crisis : "महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्र्यांची कारकीर्द कदाचित 30 जून 2022 ते 11 जुलै 2022"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 07:18 PM2022-06-30T19:18:28+5:302022-06-30T19:24:36+5:30

Maharashtra Political Crisis NCP Amol Mitkari : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी खोचक टीका केली आहे. 

Maharashtra Political Crisis NCP Amol Mitkari Slams BJP And Eknath Shinde | Maharashtra Political Crisis : "महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्र्यांची कारकीर्द कदाचित 30 जून 2022 ते 11 जुलै 2022"

Maharashtra Political Crisis : "महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्र्यांची कारकीर्द कदाचित 30 जून 2022 ते 11 जुलै 2022"

Next

मुंबई - एकनाथ शिंदे (Shivsena Eknath Shinde) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. त्यांना भाजपाचा पाठिंबा देईल. या सरकारला माझे समर्थन असेल अशी घोषणा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आम्ही सत्तेच्या पाठिशी नाही. कुठल्यातरी मुख्यमंत्रिपदासाठी आम्ही काम करत नाही. ही तत्वाची, हिंदुत्वाची आणि विचारांची लढाई आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना भाजपा समर्थन देईल असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी (NCP Amol Mitkari) यांनी खोचक टीका केली आहे. 

अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री कारकिर्द कदाचित (30 जून 2022ते 11 जुलै 2022)..." असं म्हटलं आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांचा मास्टर माईंड हा हॅशटॅगही वापरला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा करताच मिटकरी यांनी ट्विट करत यावर काही प्रश्न उपस्थित केले. सत्तेपायी हपापलेल्या स्वार्थी लोकांसाठी तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत  लिहून ठेवलं होतं, "सत्तेसाठी हपापावे| वाटेल तैसे पाप करावे|| जनशक्तीस पायी तुडवावे| ऐसे चाले स्वार्थासाठी||" महाराष्ट्र गुजरातला विकण्याचे टेंडर घेणारे आज सरकार स्थापन करत आहेत!सावधान !!, असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे. 

दुसऱ्या एका ट्विटमध्ये, देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच्या नावाची केलेली घोषणा हा त्यांचा मास्टरस्ट्रोक आहे की शिवसेना संपवण्याचे सोयीस्कर षडयंत्र? हे येणारा काळ ठरवेल, अशी शंका अमोल मिटकरी यांनी उपस्थित केली आहे. तसेच त्यांनी याआधी खोचक टोला देखील लगावला होता.  

"महाराष्ट्रात आता रामराज्य आले. भक्तांनी कालच एकमेकांचे तोंड गोड केले. इथून पुढे शेतकऱ्यांचे पूर्ण कर्ज माफ होणार, पेट्रोल ५० रू, गॅस २५० रू होणार. महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् होणार! बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार. काय ती झाडी काय तो डोंगार? एकदम ओके सरकार" असं मिटकरी यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. 


 

Web Title: Maharashtra Political Crisis NCP Amol Mitkari Slams BJP And Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.